पालकमंत्री चंद्रकांतदादा असे का बोलले ?
दि. २१ एप्रिल २०१७ हा दिवस जळगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल. कोल्हापूर-जळगाव अपडाऊन करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तब्बल दीड महिन्यांनी (ढोबळ५४ दिवसांनी) काल जळगावात होते. अख्खा दिवास त्यांनी मैरेथॉन बैठका घेतल्या. वेळात वेळ काढून वाचनालयाला भेट, वाढदिवस असलेल्या नगसेविकेचा सत्कार आणि नृत्य स्पर्धा जिंकणाऱ्या शिवमचा सत्कार असे भरगच्च काम चंद्रकांतदादांनी केले. चंद्रकांतदादा कोल्हापुरातून जळगावात एका दिवसासाठी येवून जळगाव शहरासह जिल्ह्याचे ५० विषय मार्गी लावत असतील तर याच जिल्ह्यातून नियमित मुंबई अपडाऊन करणाऱ्या एक कैबिनेट व दुसरे राज्यमंत्री यांनी किती विषय मार्गी लावायला हवेत ?





