Wednesday, 30 November 2016

९ नगराध्यक्ष अल्पमतात

दोन वर्षांच्या स्थैर्याची हमी, नंतर अविश्वासाचे अस्त्र

जळगाव जिल्ह्यात नुकतीच निवडणूक झालेल्या १२ पालिकांमध्ये लोकनियुक्त १२ सह एका नगर पंचायतीतील नगराध्यक्षांपैकी ८ नगराध्यक्ष अल्पमतात आहेत. यात ५ नगराध्यक्ष भाजपचे, २ शिवसेनेचे, २ आघाड्यांचे आहेत. पक्षाच्या बहुमताच्या पाठबळावर ५ वर्षे पदावर राजकीय संसार करु शकतील असे ४ नगराध्यक्ष ज्यात भाजपचे २, शिवसेनेचे १ व आघाडीचे १ नगराध्यक्ष आहेत.

भाजपतील अर्धा प्याला ... !

नशा मद्याची असते तशी ती सत्तेचीही असते. सत्तेच्या नशेत मिळणारे यश कधी भरलेल्या प्याला प्रमाणे असते. म्हणजे १०० टक्के विजयाचा कैफ देणारे. कधी कधी सत्तेचा प्याला हा अर्धाच भरला जातो. काही तरी मिळवताना बरेच काही गमावले जाते. अशा प्रकारचे यश हे अर्धा भरलेल्या प्याला प्रमाणे असते. यात यश ५० टक्के असते तर अपयश ५० टक्के असते. जळगाव जिल्हा भाजपतील नेत्यांच्या प्रभावळीची अवस्था ही अशीच आहे. सर्व सामान्याला अर्धा पेला भरल्यागत वाटणारी आणि भाजप कार्यकर्त्यांना अर्धवट रिकामा वाटणारी.

Monday, 28 November 2016

अमळनेर नगराध्यक्ष विजयाचा अन्वयार्थ

अमळनेरमधील स्थानिक पुढाऱ्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीच्या सौ. पुष्पलता साहेबराव पाटील या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. या विजयाचे विश्लेषण काही मंडळी चुकीच्या पध्दतीने करीत आहेत. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर मराठ्यांनी एकत्र येवून मिळवलेला हा विजय असल्याचे चित्र काही जण रंगवत आहेत. असा दावा करणे हे धोकेदायक आहे. अमळनेरचा विजय केवळ एका समाजामुळे शक्य झाला असे म्हणत यशाचे श्रेय विशिष्ट घटकाने घेणे हे भविष्यातील राजकीय डावपेच उध्वस्त करणारे ठरू शकते.

Tuesday, 22 November 2016

गिरीश महाजनांचे निर्विवाद वर्चस्व ...

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे चंदुलाल पटेल हे दणदणीत मताधिक्य मिळवून विजयी झाले. पटेल यांच्या विजयामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व समावेश राजकारणावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. महाजन आणि त्यांच्या सोबतींचे व समर्थकांचे हे निर्मळ यश आहे.

चंदुलाल पटेल विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना महाजन, पटेल यांच्यासोबत राज्यमंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना), सुरेशदादा जैन (शिवसेना व खाविआचे नेते), महापौर (खाविआ), ललित कोल्हे (मनसे), कैलास सोनवणे (कधीतरी स्थापन केलेली शहर विकास आघाडी) होते. याच नेत्यांच्या गर्दीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, गोविंद अग्रवाल व डॉ. गुरुमुख जगवानी यांचेही हसमुख चेहरे पाहता आले.  

Wednesday, 16 November 2016

धार्मिक स्थळांची संपत्ती खरेच जप्त करावी?

नोटा बदलाच्या निर्णयानंतर सोशल मीडियात एक संदेश फिरतो आहे. तो म्हणजे, आता मंदिरांची संपत्ती सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणी करणारा. हा मेसेज कोणती मंडळी फॉर्वर्ड करीत आहेत? ज्यांनी कधीही मंदिराच्या दानपेटीत रुपया टाकला नाहीज्यांनी कधीही मंदिरासाठी देणगीची पावती फाडली नाही, अशी मंडळी हा मेसेज फास्ट फॉर्वर्ड करीत आहे. मेसेज फॉर्वर्ड करायला काहीही हरकत नाही. पण, जेव्हा मंदिरांची संपत्ती ताब्यात घ्यावी असे जेव्हा आपण लिहू शकतो तेव्हा मशीद, चर्च, गुरुद्वारा आदी प्रार्थना किंवा धर्मस्थळांचीही संपत्ती ताब्यात घेणे अपेक्षीत असते का? जेवढ्या सहजपणे आपण मंदिर लिहू शकतो तेवढ्या सहजपणे इतर प्रार्थनास्थळांचा उल्लेख करु शकतो का? याचा खुलासा होत नाही.

Monday, 14 November 2016

बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान

(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून भारतीय चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. या निर्णयाचे अनेक बरे-वाईट परिणाम सर्वत्र दिसत असून भारतीय नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे हे निश्चित. परंतु, सर्वांत लक्षवेधी परिणाम हा भारत-पाकिस्तान सीमेवर दिसत असून नोटा रद्दच्या निर्णयानंतर सीमेपलिकडून भारतात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैनिक करीत असलेला अंदाधुंद गोळीबार पूर्णतः थांबला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरात कुठेही सैन्यदलांच्या विरोधात असंतोषाच्या घटना नाहीत. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या भारतीय चलनातील बनावट नोटा घेवून आता कोण मरायला भारतात घुसखोरी करेल? किंवा जम्मू-काश्मीरात बनावट नोटा घेवून कोण दगड फेकेल?   या मागील कुटनिती समजून घ्यायला बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान याचा संबंध समजून घ्यावा लागेल. 

Sunday, 13 November 2016

व्यापारातील भविष्यकार !!

कार्पोरेट कल्चरचे शिक्षण देणारे बोर्डरुम नावाचे एक पुस्तक आहे. त्याचे वाचन साधारणतः १५/१६ वर्षांपूर्वी अकोला येथे असताना मी केले होते. त्या पुस्तकातील बाजारपेठ (मार्केट), विपणन (मार्केटींग), ग्राहक आणि त्यांच्या सवयी (कस्टमर हैबीट), प्रतिष्ठान-संस्था  (कंपनी) आणि समुह कार्य (टीमवर्क) हे विषय मी झपाटल्यागत वाचले होते. बाजारपेठ आणि व्यापार याचा जुजबी परिचय झाला होता. फारसे काही समजले नव्हते. विषयाची कार्यपध्दती (थीअरी) समजली. प्रात्यक्षिक (प्रैक्टीकल) समजून घ्यायला जागा नव्हती.

Tuesday, 8 November 2016

राजकिय जाहिरातींचा किमयागार !

जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघासाठी आणि १३ नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. याच बरोबर विधान परिषदेच्या नाशिक पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार होणे सुरू आहे. एकूणच राजकिय वातावरणात गर्मी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकिय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून एकमेव भाजचे उमेदवार रिंगणात आहेत. इतर उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या जाहिर प्रचाराचा धुराळा फारसा उडणार नाही. थेट मतदाराशी लेन-देनच्या व्यवहारावर सारे काही अवलंबून असल्यामुळे उमेदवार वृत्तपत्रात किंवा इतर प्रचारावर फारसा खर्च करणार नाही. पालिकांच्या निवडणुकीचा प्रक्रिया माघारीच्या फेरीत आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. यावेळी नगराध्यक्षपदासाठी शहरांमधील सर्व मतदार मतदान करतील. म्हणजेच नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेतून तीन वर्षांच्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या संभाव्य बदलाची कल्पना येवू शकते. विज्ञानाच्या प्रयोगिक भाषेत बोलायचे तर नगराध्यक्षांची निवडणूक ही लिटमस टेस्ट आहे. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी प्रचाराची मोठी रणधुमाळी जवळपास सर्वच ठिकाणी दिसते आहे. अशा या साऱ्या गर्मीच्या वातावरणात निवडणुकीच्या जाहिर प्रचाराची साधने अद्यापही थंडावलेली दिसतात.  

Sunday, 6 November 2016

आतेभावाचे नाते हळव्या मैत्रिचे ...

तुमच्या घरात किती खोल्या आहेत आणि तुम्हाला त्यात सुख व समाधानाने राहायला किती जागा आहे यावर माणसाची श्रीमंती ठरत नाही. तुम्हाला किती मित्र आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही किती मोकळेपणाने बोलू शकता यावरच माणसाचे ऐश्वर्य ठरते. अशा प्रकारचे मित्र मला भरपूर आहेत. अनेकांशी मी अत्यंत खुलेपणाने बोलू शकतो. यात मित्रांच्या गोताळ्यात माझा एक सख्खा आणि सच्चा नातेवाईक आहे. तो म्हणजे पारोळा निवासी तथा विमा विकास अधिकारी असलेला आतेभाऊ मिलींद मिसर. मिलींद नात्याने आतेभाऊ आहे पण सहवासातून आम्ही मित्र आहोत. एकमेकांविषयी मोकळेपणे बोलायच्या आम्ही एकमेकांच्या जागा आहोत. आयुष्याच्या वळणावरील अनेक कटू व गोड आठवणी आम्ही एकमेकांना सांगितल्या आहेत आणि त्या व्यक्तिगत स्वरुपातच जपल्या आहेत. त्याचा गावभर कधी बभ्रा केला नाही.