मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर राज्य सहकारी शिखर बँकेत (एमएससी बँक) सन २००५ ते २०१० दरम्यान झालेल्या कर्ज वाटप
घोळाची तक्रार दाखल आहे. हा घोळ सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा
दावा तक्रारीत आहे. तब्बल ४ वर्षे सुनावणी सुरु असलेल्या या तक्रारीत आढळलेल्या
तथ्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला संशयित आरोपांच्या विरोधात ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयात मूळ
तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांची
आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कलम ४२० (फसवणूक – दखलपात्र, अजामीनपात्र),
५०६ (अन्यायाने
धमकावणे – अदखलपात्र, जामीनपात्र), ४०९ (सरकारी नोकर आदींनी विश्वासघात करणे), ४६५ (बनावट
कागदपत्रे तयार करणे) आणि कलम ४६७ (किमतीचा दस्तऐवज / मृत्युलेख बनावट तयार करणे) नुसार संशयितांच्या
विरोधात गुन्हा (एफआयआर) नोंद झाला
आहे.
Thursday, 26 September 2019
Saturday, 14 September 2019
'एमआरपी' चा घोळ आणि झोल
![]() |
| स्पार्क बूट एमआरपी ९९९ रुपये |
Sunday, 1 September 2019
Saturday, 31 August 2019
Thursday, 29 August 2019
मराठा मंडळ* आणि राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे भारतीय जनता पक्षावर आणि विरोधकांवर टीका करताना इतिहासातील मोजक्या संदर्भांचा खोचकपणे उल्लेख करतात. उदाहरण द्यायचे तर मनोहर जोशी हे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचा उल्लेख पवार यांनी श्रीमंत मनोहरपंत असा केला होता. जोशींना श्रीमंत पंत म्हणताना पवार यांना पेशव्यांना संबोधून होणारे श्रीमंत व छत्रपतींचे कारभारी पंत प्रतिनिधी या पदाची आठवण करुन द्यायची होती. जोशी हे शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. एक प्रकारे ते बाळासाहेबांचे प्रतिनिधी होते. शिवाय, ब्राह्मण असल्याने त्यांच्या रुपात श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांची पेशवाई अवतरली असे दर्शवायचा पवार यांचा हेतू होता.
Saturday, 24 August 2019
ग्राहकाचा मूड बदलला आहे
मंदीच्या
चक्रव्युहात जागतिक अर्थ व्यवस्था सापडली आहे. जगभरातील सर्वच माध्यमातून
याच विषयावर चर्चा सुरु आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या वेब साईटवर 'आर्थिक
विश्लेषण आणि धोरण' विभागात जागतिक अर्थ व्यवस्था आणि संभवता संदर्भात
माहिती दिली आहे. सन २०१९ आणि २०२० मध्ये जगाची अर्थ व्यवस्था विस्तारत
असली तरी ती काहीशी क्षीण होऊन तिचा आलेख खाली घसरत असल्याबद्दल चिंता
व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपसूक विकास प्रकल्प आणि त्याच्या वेगावर होत
आहे. आर्थिक क्षेत्रात जोखिमा वाढत असून बहुतेक विकसनशील देशांचा विकास दर
घसरला आहे. ठप्प होणाऱ्या व्यवहारांमुळे जगभराची अर्थ व्यवस्था डळमळीत
झाल्याचे म्हटले आहे.
Thursday, 22 August 2019
'तुला काय व्हायचे, हे पाल्यास विचारा'
अनीश सहस्त्रबुध्दे यांचा पालकांना सल्ला
'गप्पा इंडियाशी' या अभिनव उपक्रमात अनीश सहस्त्रबुध्दे (सोलापूर) यांना ऐकण्याची संधी मिळाली. आशा फौंडेशन आणि रोटरी क्लब वेस्ट यांनी संयुक्तपणे 'गप्पा इंडियाशी' हा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे निवेदन आणि गप्पा असा उपक्रम सुरु केला आहे. यात दरमहा एका मान्यवराला आमंत्रित केले जात आहे. नेहमीच्या कार्यक्रमांच्या चौकटीतून बाहेर पडून आशा फौंडेशन सोबत 'गप्पा इंडियाशी' या उपक्रमाला प्रायोजित केल्याबद्दल रोटरी क्लब वेस्टच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. रोटरीने अजूनही काही पारंपरिक चौकटी मोडायला हव्यात. कारण चौकटी त्याच पण चेहरे केवळ बदलले याचा चौकटबद्ध प्रवास रोटरी भवनच्या भिंतीवरच लावला आहे.
'गप्पा इंडियाशी' या अभिनव उपक्रमात अनीश सहस्त्रबुध्दे (सोलापूर) यांना ऐकण्याची संधी मिळाली. आशा फौंडेशन आणि रोटरी क्लब वेस्ट यांनी संयुक्तपणे 'गप्पा इंडियाशी' हा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे निवेदन आणि गप्पा असा उपक्रम सुरु केला आहे. यात दरमहा एका मान्यवराला आमंत्रित केले जात आहे. नेहमीच्या कार्यक्रमांच्या चौकटीतून बाहेर पडून आशा फौंडेशन सोबत 'गप्पा इंडियाशी' या उपक्रमाला प्रायोजित केल्याबद्दल रोटरी क्लब वेस्टच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. रोटरीने अजूनही काही पारंपरिक चौकटी मोडायला हव्यात. कारण चौकटी त्याच पण चेहरे केवळ बदलले याचा चौकटबद्ध प्रवास रोटरी भवनच्या भिंतीवरच लावला आहे.
Sunday, 11 August 2019
गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच !
कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदत कार्यात स्वतः सहभागी होऊनही मोबाईल सेल्फी आणि व्हीडीओमुळे ना. गिरीशभाऊ महाजन भयंकर टीकेचे धनी ठरले आहेत. ना. भाऊंचे योग्य की अयोग्य अशा द्विधा मनःस्थितीत मी स्वतः होतो. मंत्र्याने पूरस्थितीची पाहाणी करायला हवी, आपदग्रस्तांना भेटायला हवे, मदत कार्यात लक्ष घालायला हवे, या गोष्टी योग्य वाटत होत्या. पण हे करीत असताना सेल्फी व व्हीडीओचा घोळ टाळता आला असता.
Monday, 29 July 2019
सोशल मीडियातील रुग्णांचे प्रकार
सोशल मीडियाचे पर्याय असलेल्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये शेअरिंग करणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना ४ वेगवेगळे आजार बळावल्याचे अनुभवाला येते. हे आजार शाब्दीक स्वरुपातील पोटशूळ, पोटदूखी, अजीर्ण आणि उलट्या या प्रकारातील आहेत. या आजारांची लक्षणे फारच साधी असतात. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये एखाद्या विषयी चांगल्या लेखनाची पोस्ट शेअर केली, की वरील चारही आजारातील रुग्ण सदस्यांची बोटे विरोधासाठी भराभरा किपैडवर चालू पडतात. अमूक व्यक्ती विषयी चांगले लिहिलेच कसे ? या प्रश्नाची अस्वस्थता घेऊन मग पक्ष, समाज, जात आणि नंतर व्यक्तिगत घसरणाऱ्या प्रतिक्रिया सुरु होतात. नुसत्या एक मेसेजने नाही भागले की, मेसेजची मालिका सुरु होते. भाषा हळूहळू अगदीच कुजकट पातळीवर जाते. मग संबंध नसलेल्या घटनांचा, व्यक्तिंचा उल्लेख सुरु होतो. काही उत्साही रुग्ण आपणच लिहिलेल्या पोस्टवर स्वतःच हास्याचे इमोजी टाकतात. असे करणे म्हणजे आजार बोटापासून मेंदूपर्यंत भयंकर बळावल्याचे लक्षण मानावे. अशा लक्षणांचे ४ आजार पुढील प्रमाणे आहेत.
Saturday, 20 July 2019
दोष कोणाला लावणार ?
जळगाव येथील खान्देश सेंट्रल मॉल मधील बीग बाजार मॉल बंद करण्यात आला. व्यवस्थापनाने ३ महिन्यांचे वेतन अगाऊ देऊन मॉलची टाळेबंदी केली. २०० च्या आसपास पुरुष व महिलांचे रोजगार हिरावले गेले. जळगावमध्ये सर्व प्रथम मॉल कल्चर घेऊन आलेल्या विशाल मॉलनेही वर्षा-दीडवर्षांत जळगाव सोडले. तेव्हाही १०० वर जणांचा रोजगार गेला. यापूर्वी ब्लो प्लास्ट कंपनी गेली. कामगार बेकार झाले. रेमंड कंपनीने उत्पादने कमी केली. तेव्हा जळगावमधील कामगार असंतोषाचा भडका उडाला. अशा इतरही घटना आहेत. एकूण परिणाम काय, तर कंपनी बंद आणि कामगार बेरोजगार. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे, जळगावमधील कामगार वा कर्मचारी असंतोषाचा.
Subscribe to:
Posts (Atom)








