Saturday, 31 August 2019

अब तेरा क्या होगा कालिया ?

जळगाव महानगर पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल अर्धा अपेक्षेनुसार आणि अर्धा धक्कादायक लागला. खटल्यातील ४८ संशयितांना शिक्षा सुनावली जाईल हे माझ्या अनुभवाधारे नक्की होते. मात्र आरोप सिद्धचा ठपका ठेऊन संगनमतात सहभागी प्रत्येकाडून सक्तीचा जबरी दंड सुध्दा वसूल केला जाईल हे ध्यानीमनी नव्हते.

Thursday, 29 August 2019

मराठा मंडळ* आणि राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे भारतीय जनता पक्षावर आणि विरोधकांवर टीका करताना इतिहासातील मोजक्या संदर्भांचा खोचकपणे उल्लेख करतात. उदाहरण द्यायचे तर मनोहर जोशी हे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचा उल्लेख पवार यांनी श्रीमंत मनोहरपंत असा केला होता. जोशींना श्रीमंत पंत म्हणताना पवार यांना पेशव्यांना संबोधून होणारे श्रीमंत व छत्रपतींचे कारभारी पंत प्रतिनिधी या पदाची आठवण करुन द्यायची होती. जोशी हे शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. एक प्रकारे ते बाळासाहेबांचे प्रतिनिधी होते. शिवाय, ब्राह्मण असल्याने त्यांच्या रुपात श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांची पेशवाई अवतरली असे दर्शवायचा पवार यांचा हेतू होता.

Saturday, 24 August 2019

ग्राहकाचा मूड बदलला आहे

मंदीच्या चक्रव्युहात जागतिक अर्थ व्यवस्था सापडली आहे. जगभरातील सर्वच माध्यमातून याच विषयावर चर्चा सुरु आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या वेब साईटवर 'आर्थिक विश्लेषण आणि धोरण' विभागात जागतिक अर्थ व्यवस्था आणि संभवता संदर्भात माहिती दिली आहे. सन २०१९ आणि २०२० मध्ये जगाची अर्थ व्यवस्था विस्तारत असली तरी ती काहीशी क्षीण होऊन तिचा आलेख खाली घसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपसूक विकास प्रकल्प आणि त्याच्या वेगावर होत आहे. आर्थिक क्षेत्रात जोखिमा वाढत असून बहुतेक विकसनशील देशांचा विकास दर घसरला आहे. ठप्प होणाऱ्या व्यवहारांमुळे जगभराची अर्थ व्यवस्था डळमळीत झाल्याचे म्हटले आहे.

Thursday, 22 August 2019

'तुला काय व्हायचे, हे पाल्यास विचारा'

अनीश सहस्त्रबुध्दे यांचा पालकांना सल्ला

 'गप्पा इंडियाशी' या अभिनव उपक्रमात अनीश सहस्त्रबुध्दे (सोलापूर) यांना ऐकण्याची संधी मिळाली. आशा फौंडेशन आणि रोटरी क्लब वेस्ट यांनी संयुक्तपणे 'गप्पा इंडियाशी' हा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे निवेदन आणि गप्पा असा उपक्रम सुरु केला आहे. यात दरमहा एका मान्यवराला आमंत्रित केले जात आहे. नेहमीच्या कार्यक्रमांच्या चौकटीतून बाहेर पडून आशा फौंडेशन सोबत 'गप्पा इंडियाशी' या उपक्रमाला प्रायोजित केल्याबद्दल रोटरी क्लब वेस्टच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. रोटरीने अजूनही काही पारंपरिक चौकटी मोडायला हव्यात. कारण चौकटी त्याच पण चेहरे केवळ बदलले याचा चौकटबद्ध प्रवास रोटरी भवनच्या भिंतीवरच लावला आहे.

Sunday, 11 August 2019

गिरीशभाऊ तुम्हारा चुक्याच !

कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदत कार्यात स्वतः सहभागी होऊनही मोबाईल सेल्फी आणि व्हीडीओमुळे ना. गिरीशभाऊ महाजन भयंकर टीकेचे धनी ठरले आहेत. ना. भाऊंचे योग्य की अयोग्य अशा द्विधा मनःस्थितीत मी स्वतः होतो. मंत्र्याने पूरस्थितीची पाहाणी करायला हवी, आपदग्रस्तांना भेटायला हवे, मदत कार्यात लक्ष घालायला हवे, या गोष्टी योग्य वाटत होत्या. पण हे करीत असताना सेल्फी व व्हीडीओचा घोळ टाळता आला असता.

Monday, 29 July 2019

सोशल मीडियातील रुग्णांचे प्रकार

सोशल मीडियाचे पर्याय असलेल्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये शेअरिंग करणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना ४ वेगवेगळे आजार बळावल्याचे अनुभवाला येते. हे आजार शाब्दीक स्वरुपातील पोटशूळ, पोटदूखी, अजीर्ण आणि उलट्या या प्रकारातील आहेत. या आजारांची लक्षणे फारच साधी असतात. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये एखाद्या विषयी चांगल्या लेखनाची पोस्ट शेअर केली, की वरील चारही आजारातील रुग्ण सदस्यांची बोटे विरोधासाठी भराभरा किपैडवर चालू पडतात. अमूक व्यक्ती विषयी चांगले लिहिलेच कसे ? या प्रश्नाची अस्वस्थता घेऊन मग पक्ष, समाज, जात आणि नंतर व्यक्तिगत घसरणाऱ्या प्रतिक्रिया सुरु होतात. नुसत्या एक मेसेजने नाही भागले की, मेसेजची मालिका सुरु होते. भाषा हळूहळू अगदीच कुजकट पातळीवर जाते. मग संबंध नसलेल्या घटनांचा, व्यक्तिंचा उल्लेख सुरु होतो. काही उत्साही रुग्ण आपणच लिहिलेल्या पोस्टवर स्वतःच हास्याचे इमोजी टाकतात. असे करणे म्हणजे आजार बोटापासून मेंदूपर्यंत भयंकर बळावल्याचे लक्षण मानावे. अशा लक्षणांचे ४ आजार पुढील प्रमाणे आहेत.

Saturday, 20 July 2019

दोष कोणाला लावणार ?

जळगाव येथील खान्देश सेंट्रल मॉल मधील बीग बाजार मॉल बंद करण्यात आला. व्यवस्थापनाने ३ महिन्यांचे वेतन अगाऊ देऊन मॉलची टाळेबंदी केली. २०० च्या आसपास पुरुष व महिलांचे रोजगार हिरावले गेले. जळगावमध्ये सर्व प्रथम मॉल कल्चर घेऊन आलेल्या विशाल मॉलनेही वर्षा-दीडवर्षांत जळगाव सोडले. तेव्हाही १०० वर जणांचा रोजगार गेला. यापूर्वी ब्लो प्लास्ट कंपनी गेली. कामगार बेकार झाले. रेमंड कंपनीने उत्पादने कमी केली. तेव्हा जळगावमधील कामगार असंतोषाचा भडका उडाला. अशा इतरही घटना आहेत. एकूण परिणाम काय, तर कंपनी बंद आणि कामगार बेरोजगार. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे, जळगावमधील कामगार वा कर्मचारी असंतोषाचा.

Sunday, 14 July 2019

जळगावकर म्हणून घ्यायची पात्रता आहे ?

यावर्षीचा पावसाळा जळगावकरांसाठी मनःस्ताप घेऊन आला आहे. अमृत योजनेच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचा ऊत-मात झालेला आहे. घंटागाड्या जमेल तेवढा कचरा गोळा करीत असल्या तरी लोकांनी कॉलनींच्या मोकळ्या जागेत वा कचरा कुंड्यांजवळ टाकलेला कचरा उचलला जात नाही आहे. अशा स्थितीत जळगाव हे कचरा, घाण, माश्या, डास व मच्छरांचे गलिच्छ शहर झाले आहे. अर्थात, याचा दोष नेहमी प्रमाणे महानगरपालिकेवर फोडला जात असून अमृत योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांचे १२ वाजले असा ढोबळ दोष लावला जातोय. सोशल मीडियातून टीका टीपण्या करताना राजकीय पुढाऱ्यांना टीकेचे धनी केले जात आहे.

Wednesday, 19 June 2019

बाजार समितीतील नियोजित व्यापारी संकुलास विरोधाचे गौडबंगाल

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील व्यापारी संघटन गेले १५ दिवस नियोजित व्यापारी संकुलाच्या बांधकाम विषयावरुन चर्चेत आहे. या प्रकरणाकडे सामान्य जळगावकरांनी अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. बहुधा कारण असावे की, हा वाद बाजार समिती, व्यापारी आणि नियोजित संकुलाचे बांधकाम करणारे विकासक यांच्यात असावा. या ३ घटकांमध्ये शेतकरी, तेथील हमाल-मापाडी व कर्मचारी सक्रिय दिसत नाहीत. या ३ घटकांच्या भल्यासाठी व्यापारी संघटनेने कृती केली आहे, असे सुद्धा काहीही दिसत नाही. मात्र, जागृत जनमंचचे श्री. शिवराम पाटील यांनी बाजार समिती पदाधिकारी व व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी यांच्याशी केलेल्या चर्चेच्या ध्वनी व चित्रफिती सोशल मीडियातून प्रसारित झाल्यानंतर नियोजित संकुलाचा विषय सामान्य जळगावकरांपर्यंत पोहचला. नियोजित संकुलास विरोध करताना बाजार समितीतील व्यापारी संघटनने बंद पुकारुन शेतकरी, हमाल-मापाडी व कर्मचाऱ्यांना वेठीस धरलेले आहे, असे दिसते. अशा स्थितीत बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलास विरोधाचे गौडबंगाल काय आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे.

Tuesday, 11 June 2019

जळगाव मधील व्यापाऱ्यांची 'चित भी मेरी और पट भी मेरी'

जळगावकर नागरिक जरा लक्ष द्या. शहरात नागरिक म्हणून राहायचे असेल तर तुम्हाला मनपाचा मालमत्ता कर व पाणी पट्टी भरावी लागेल. भलेही रस्ते, गटारी, पाणी, पथदीप, स्वच्छता आदी सुविधा मनपा देणार नाही. तरीही करवसुलीच्या नोटीसा नागरिकांच्या घरादारांवर चिटकवल्या जातील. पण तुम्ही जर जळगावात कशाचेही व्यापारी (बेपारी) असाल तर तुम्ही मनपा किंवा इतर संस्था यांचे भाडे, कर असे काहीही थकवू शकतात. तुम्ही व्यापारी म्हणून कधी एका नेत्याकडे तर गरज पाहून दुसऱ्याकडे जावू शकतात. बरे नेतेही एवढेच रिकामे की, नागरिकांचे भले करण्याऐवजी व्यापारी हिताचेच काम करणार. जळगावमधील व्यापारी स्वतःच्या लाभासाठी पुढाऱ्यांना कसे वापरतात याची ३ ठळक उदाहरणे समोर आहेत. एकात भाजपच्या नेत्यांनी, दुसऱ्यात शिवसेनेच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतली आहे. तिसऱ्या प्रकरणात व्यापाऱ्यांच्या मदतीने पोलिसांची वरकमाई सुरु आहे.