Monday, 27 November 2017

ना. गिरीषभाऊ ! टू राईट अॉर नॉट राईट ?

संपूर्ण राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प करुन वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन आणि त्यांची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या संकल्पनेचे मूळ जनक ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने व विक्रमी शल्यचिकित्सक डॉ. रागिनी पारेख हे दोघेही दिवसाला २०० वर रुग्णांचे मोतीबिंदू काढत आहेत. ज्येष्ठ व सर्वांत बुजूर्ग समाजसेवक अण्णा हजारे यांनी ना. महाजन यांच्या आरोग्य महाशिबिर आयोजनाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

Wednesday, 22 November 2017

"दशक्रिया" ला विरोध कशासाठी ?

ब्राह्मण समाजातील पोट जातींमधील कर्मकांडाच्या वादावर आधारलेल्या दशक्रिया या चित्रपटाला ब्राह्मण समाजाकडून विरोधाचे वातावरण आहे. विषय ब्राह्मणांशी संबंधित असल्यामुळे इतर मंडळींनी दशक्रिया चित्रपट प्रदर्शनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत ब्राह्मण द्वेषाचे बी पेरणारी विचारधारा विस्तारते आहे. ज्यांचे राजकारण जात व समाजावर आधारलेले आहे अशी राजकीय मंडळी सतत अस्वस्थ आहे. समाज आधारित पक्षीय राजकारण आणि संघटीत झुंडशाही निर्धारित राजकारण असे दोन्ही कार्ड वापरुन सुध्दा गावपातळी पासून तर मंत्रालयापर्यंतची सत्ता मिळू शकत नाही अशा आगतिकतेतून ब्राह्मणांच्या द्वेषाच्या अनेक जागा शोधल्या जात आहेत. याच द्वेषाची किनार दशक्रिया चित्रपट सादर व्हावा या भूमिके मागे असावी ?

Thursday, 9 November 2017

मैत्रिच्या मण्यांमधील धागा ...

अनिल जोशी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे अभीष्टचिंतन करताना मैत्रीतील दोन- चार गोष्टी लिहायची मनस्वी इच्छा आहे. सन १९९२ पासून अनिल आणि मी घट्ट मित्र आहोत. बहुतांश गोष्टी आम्ही एकमेकांकडे शेअर करतो. तरीही अरे - तुरेचे नाते काही आमच्यात निर्माण झाले नाही. याचे कारण म्हणजे, अनिल यांनी  व्यक्तिशः माझा आदर करणे कधीही सोडले नाही. नोकरीत शिकाऊ असल्यापासून आम्ही सहकारी होतो. वयाने मी मोठा असल्याने अनिल यांना दरडावण्याचा अधिकार मी खूप वेळा वापरला मात्र, अनिल यांनी प्रत्युत्तर न देता नेहमी आदरच केला. नंतर मान सन्मानाच्या पदावरही दोघांनी सोबत काम केले. अनेकवेळा अनिल आणि माझ्यात विवादाचे विषय आले. मी वेळप्रसंगी टोकाचा वागलो. पण अनिल यांनी संभाव्य वाद नेहमी जेवणाच्या टेबलावर मिटवला.

Friday, 3 November 2017

खिचडीची सुध्दा अफवा शिजली !

केंद्र सरकारचा अन्न व प्रक्रिया उद्योग खिचडीला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करणार अशी अफवा सोशल मीडियात मागील आठवड्यात शिजली. सोशल मीडियात चाललेला खिचडीचा हा दिशाभूल करणारा ट्रेण्ड केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या ट्विटरवरील खुलाशामुळे अफवा असल्याचे सिध्द झाला. बादल यांनी स्पष्ट केले की, येत्या ४ नोव्हेंबर रोजी खाद्यदिन साजरा होत आहे. त्या अनुषंगाने मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्याचा दर्जा दिला जाणार असे माध्यमांमधील प्रसारित वृत्त निखालस खोटे आहे. खिचडीला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी वर्ल्ड फूड इंडिया (WorldFoodIndia) या महोत्सवात सुप्रसिध्द शेफ मंडळी खिचडीचा स्वाद या महोत्सवात सादर करणार आहेत. एक प्रकारे हा महोत्सव म्हणजे खिचडी महोत्सव आहे.

Monday, 30 October 2017

दोन मंत्र्याच्या ... दोन तऱ्हा ... !!

राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन सध्या द ग्रेट शो मैन ठरले आहेत. जळगाव, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हास्तरावरील आरोग्य महा शिबिरे आयोजित करुन सर्व सामान्य घटकातील रुग्णांना रोगमुक्त करण्याचा एक अभिनव उपक्रम महाजन यांनी गेले वर्षभर सुरु ठेवला आहे. महाजन यांच्या सोबतच्या मंडळींचे सहकार्य घेवून राज्याच्या पुरवठामंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी सुध्दा बीड येथे जिल्हास्तरावरील महा शिबिर घेतले. आता तालुकास्तरांवरील शिबिरांना प्रारंभ झाला आहे.

Saturday, 28 October 2017

शरद पवार नेहमीच खरे बोलतात !

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले अभ्यासू, अनुभवी, लोकप्रिय आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले आणि अलिकडे जाणता राजा म्हणून लौकिक लाभलेले शरश्चंद्र तथा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना बालिश मुख्यमंत्री अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षांत महाराष्ट्रातील निवडणुकांच्या राजकारणात फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने पवार कुटुंबियांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार धोबीपछाड दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार यांच्या ताब्यातील अनेक गढ्या या फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने काबिज केल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्या आडून टीका करताना मुख्यमंत्री पदावरील व्यक्तिस बालिश म्हटले आहे.

Wednesday, 25 October 2017

राजकिय उलथा-पालथचे हत्यार - सोशल मीडिया

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी सन २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यासाठी मतदारांना अनुकूल करायला फेसबुक, ट्विटर आणि गुगल या माध्यमांचा गैरवापर रशियन सरकारने केला, हे मान्य करीत फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग याने अमेरिकन जनतेची माफी मागितली आहे. झुकेरबर्ग याने असे जाहीरपणे का केले ते अगोदर समजून घेवू.

Wednesday, 11 October 2017

अमृत योजनेतील मक्तेदारीचा घोळ ...

जळगाव  शहरातील  सुमारे पाच लाखांवर जनतेच्या पाणीपुरवठ्यासाठी वर्षभरापासून मंजूर असलेल्या अमृत योजनेच्या कामासाठी संतोष कन्सट्रक्शन ऍण्ड इन्फ्रा यांना मंजूर झालेली निविदा प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्दबातल ठरविली आहे. हा आदेश देताना न्यायाधिशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कार्यशैलीवर कडक ताशेरे ओढले आहेत. विशिष्ट ठेकेदाराला काम देण्याचा दबाव मनपा प्रशासनावरही झालेला आहे, असेही आता प्रथम दर्शनी दिसत आहे. खंडपिठाने अमृत योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळा व योग्यता नसलेल्या मक्तेदारास काम देण्याचा घाट घालणेसंबंधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जबाबदार असल्याचा दोष लावला आहे.  

Monday, 2 October 2017

गांधी मुखातून गांधीवाद ...!!!

जळगाव येथील गांधीतिर्थमध्ये युवकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची भेट झाली. जवळपास दोन तास सोबत होतो. त्यांनी युवकांशी साधलेला संवादही ऐकला होता. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या सर्वसामान्य व सर्वमान्यपणाविषयी मी तुषारजींशी बोलत होतो. त्यांच्याशी झालेला हा संवाद माझ्यासाठी गांधी मुखातून गांधीवाद ऐकण्याएवढा आनंददायी होता.

Tuesday, 19 September 2017

मला किशोर राजे निंबाळकर व्हायचे आहे ... !

किशोर राजे निंबाळकर
लेखाचे शिर्षक वाचून अनेकांना वाटेल, हे काय खूळ आहे. प्रत्येकाला कलेक्टर किशोर राजे निंबाळकर कसे होता येईल ? कलेक्टर होणे एवढे सोपे आहे का ? हे दोन्ही प्रश्न रास्त आहे. पण, स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होवून अमर्याद अधिकार असलेला कलेक्टर होणे फारसे अवघड सले तरी अधिकारांचे उच्च पदस्थ बुजगावणे व्हायचे की अधिकारांचा समाजासाठी वापर करीत माणूस व्हायचे याचा निर्णय प्रत्येकाला घेता येणे शक्य आहे. लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी म्हणून प्रचंड अधिकार प्राप्त असले तरी सामान्य माणसासाठी लोकसेवकाच्या मानसिकतेतून माणूस होणे फारच थोड्यांना साधते. तसे ते जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना साधले आहे. माणूस असलेला अधिकारी अशी ओळख राजे निंबाळकर यांनी निर्माण केली आहे.