Wednesday, 17 May 2017

वैचारिक दहशतवाद

सत्ता, संपत्ती, अधिकार आणि शोषण अशा चार प्रमुख गोष्टींच्या हव्यासापोटी दहशतवाद किंवा नक्षलवाद बळावतो. या चारही गोष्टी ज्यांना हव्यात ते समुह करुन एकत्र येतात. हे एकत्र येणे प्रथमतः धर्माच्या नावावर असते. त्यानंतर पंथ, वर्ण, समाज, जात, लिंग आणि कार्य अथवा विचारांच्या सामायिकतेतून लोकांना एकत्र आणले जाते. ज्या चार गोष्टींची मागणी करायची त्यासाठी अगोदर लक्षवेधी आक्रोश केला जातो. आक्रोशातून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आंदोलन उभे राहते. आंदोलनाचे मूलतः दोनच प्रकार असतात. पहिला अहिंसक व दुसरा हिंसक.

दहशतवादाला मूक विरोध ...

परदेशातून आणि देशांतर्गत अशा दोन्ही प्रकारच्या दहशतवादी व घातपाती कारवायांचा सामना करणाऱ्या भारतात दरवर्षी दि. २१ मेस दहशतवाद विरोधीदिन साजरा केला जातो. श्रीलंकन दहशतवादी संघटना लिट्टेने आत्मघाती बॉम्बचा वापर करून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरंबुदूर (तामिळनाडू) येथे दि. २१ मे १९९१ ला हत्या घडवून आणली होती. त्यांच्या स्मृतिनिमित्त काँग्रेस आघाडी सरकारने देशभरात दहशतवाद विरोधीदिन दि. २१ मेस साजरा करणे सुरू केले. अर्थात, यामागे भारतात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून होणाऱ्या घातपाती कारवायांचा इतिहास व ताजा वर्तमानही आहे.  

Saturday, 6 May 2017

बदल्यांच्या फडणिशीत फडणवीस नापास

राज्याच्या प्रशासनात एप्रिल महिन्यापासून आयएएस व आयपीएस श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा माहौल आहे. यात प्रामुख्याने चर्चेतल्या बदल्या या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस  अधिक्षकांच्या असतात. महसूल मंत्रालय जिल्हाधिकारी तर गृहमंत्रालय जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये लक्ष घालते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील असून गृहमंत्रालय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. गेल्या महिनाभरात या दोन्ही मंत्रालयांनी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेक घोळ झाल्याचे लक्षात येत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे घाऊक आदेश काढल्यानंतर त्यात वेगाने एकेकाची बदली रद्द करुन नवी पदस्थापना दिल्याचा स्वतंत्र आदेश निघत आहे. अशा अनेक प्रकारांचा पंचनामा माध्यमांमधून सुरू आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या अंतिमतः मुख्यमंत्र्यांच्या संमतीने होतात. म्हणजेच, बदल्यांचा सारा घोळ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच सुरू आहे. सध्याच्या फडणवीसांचा कारभार बदल्यांच्या फडणविशीत नापास ठरल्याचे दिसत आहे. बदल्यांमधील हा घोळ खरच पारदर्शक आहे ? या विषयी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते खुलेपणाने बोलतील का

Tuesday, 2 May 2017

खडसे पक्षाच्या नव्हे, तर प्रवृत्तींच्या विरोधात ...

सत्तेपासून सध्यातरी लांब बसलेले माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मनांतील खंत पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्री होवू नये म्हणून अनेकांनी उद्योग केले. घाणेरडे राजकारण करीत बिनबुडाच्या आरोपांच्या फैरीही माझ्यावर डागल्या. मात्र, मी मंत्रिपद त्यागल्यानंतर गेल्या वर्षभरात एकही विरोधक माझ्यावर केलेला एकही आरोपल सिद्द करु शकलेला नाही. खडसेंच्या या वक्तव्याची दखल आज जय महाराष्ट्र या चॅनेलवर घेण्यात आली. त्यामुळे त्यांची चर्चा पुन्हा राज्यभर सुरू झाली. अशा वातावरणात खडसेंसारखा तावून सलाखून निघालेला माणूस आता योग्य वेळेची प्रतिक्षा करीत आहे. भविष्यात कोणती वेळ कोणता प्रश्न घेवून येईल यासाठी प्रतिक्षाच करणे योग्य राहील. 

Monday, 1 May 2017

मुलांना शिव्या देता आल्या पाहिजेत !

सातवर्षे वयोगटातील मुला मुलींच्या शिबिरात जाण्याचा योग आला. शिबिरार्थींना चित्रकलेचा साधा सोपा प्रकार समजून सांगितला. वेळ होता म्हणून त्यांच्याशी गप्पा केल्या. मुला मुलींना थेट विचारले, तुम्हाला शिव्या देता येतात का ? हा असभ्य प्रश्न अचानक विचारल्याने मुले भांबाळली. एकमेकाकडे पाहू लागली. शिव्या देता येतात का प्रश्नाचे सरळ उत्तर नकाराचे होते. पण, तुम्हाला कोणत्या शिव्या माहित आहे ? या प्रश्नावर मुले म्हणत होती, मूर्ख, नालायक, स्टुपीड, भैताड .... ! मला गंमत वाटत होती. शिव्या म्हणजे अपशब्द उच्चारणे हे मुलांना निषिद्ध वाटत होते मात्र त्यांच्याकडे ५/१० शिव्यांचा साठा नक्कीच होता.

Friday, 21 April 2017

"उद्योगी" आमदारांना चंद्रकांतदादांचा इशारा ...


पालकमंत्री चंद्रकांतदादा असे का बोलले ?

दि. २१ एप्रिल २०१७ हा दिवस जळगावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल. कोल्हापूर-जळगाव अपडाऊन करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तब्बल दीड महिन्यांनी (ढोबळ५४ दिवसांनी) काल जळगावात होते. अख्खा दिवास त्यांनी मैरेथॉन बैठका घेतल्या. वेळात वेळ काढून वाचनालयाला भेट, वाढदिवस असलेल्या नगसेविकेचा सत्कार आणि नृत्य स्पर्धा जिंकणाऱ्या शिवमचा सत्कार असे भरगच्च काम चंद्रकांतदादांनी केले. चंद्रकांतदादा कोल्हापुरातून जळगावात एका दिवसासाठी येवून जळगाव शहरासह जिल्ह्याचे ५० विषय मार्गी लावत असतील तर याच जिल्ह्यातून नियमित मुंबई अपडाऊन करणाऱ्या एक कैबिनेट व दुसरे राज्यमंत्री यांनी किती विषय मार्गी लावायला हवेत ?

Thursday, 20 April 2017

कौटुंबिक गप्पांमध्ये लैंगिकता विषय हवा !

"समाजस्वास्थ" नाटकाच्यानिमित्त धाडसी चर्चा ...

स्त्री-पुरुषाच्या सहजीवनात घडणाऱ्या अनेक नैसर्गिक क्रियांपैकी अत्यंत महत्त्वाची आणि दोघांच्या सहमतीने दीर्घकाळ चालणारी क्रिया म्हणजे परस्परांसोबतचा प्रणय.  पटकन समजेल असा इंग्रजी शब्द म्हणजे रोमान्स. स्त्री-पुरुषामध्ये परस्परांप्रति असलेल्या आकर्षणातून मानसिक व शारीरिक अशा अनेक क्रिया घडतात. त्या नैसर्गिक असतात. संवाद, स्पर्श आणि समर्पण अशा माध्यमातून होणारी ही क्रिया भिन्न लिंग आकर्षणातून स्त्री-पुरुषाच्या लैंगिक संबंधापर्यंत जाते. दोघांच्याही सहजीवनात ही नैसर्गिक क्रिया नाकारता येत नाही आणि एकमेकांच्या सहमती, सहकार्य व समर्पणाशिवाय पूर्णही होत नाही.

Friday, 14 April 2017

सातबारा कोरा होणे कठीणच !

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की कर्जमुक्त करावे ? या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकात बराच खल झाला. सन २००८/९ मध्ये केंद्रातील व महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेली अंशतः कर्जमाफी, मदतीचे विविध पैकेज आणि सध्याच्या भाजप नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकार यांनी केलेली मदत या विषयांवर चर्चा झाली. विरोधकांनी कर्जमाफी हा विषय लावून धरला आहे. सत्ताधारी कर्जमुक्तीवर जोर देत आहेत. या दोघांच्या भूमिकांमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आशाळभूत झाला आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटपात महत्त्वाची भूमिका असलेल्या जिल्हा सहकारी बँकाही कर्जवसुलीची टक्केवारी घसरल्याने कर्जमाफी झाल्यास सरकारकडून हमखास मिळणाऱ्या रकमेकडे डोळे लावून आहेत. मात्र, या मागील आर्थिक गणित समजून घेणे आवश्यक आहे.

Tuesday, 11 April 2017

Why Sharad Pawar blemished man of corruption ?

Maharashtrian powerful leader Sharad Pawar honoured Padmavibhushan award by hands of president of Hindusthan Pranab Mukharji. This is one step down award compared with Bharatratna.

Prime Minister Narendra Modi government offered this Padma award to Pawar without any nomination or recommendations by State government or members of parliament. Modi always admir sensitivity, sensiblity and seniority of Pawar in politics and social libelities as being CM of Gujrat to become PM of Hindusthan. Both have friendly and faithful relationship on each other. Both publicly shows respects about each other, though makes some bad comment at the time of political propaganda or election campaign, rallies.

Saturday, 8 April 2017

हणमंत गायकवाड यांची यशसूत्रे

(हा लेख हा दैनिक देशदूत – खानदेश आवृत्तीच्या शब्दगंध पुरवणीत (दि. ९ एप्रिल २०१७ (पान १५ वर प्रकाशित झाला आहे)

बीव्हीजी इंडियाचे चेअरमन तथा व्यवस्थापकिय संचालक हणमंत गायकवाड यांचे दि. ७ एप्रिलला जळगाव येथे कल्पनेपलिकडचे यश या विषयावर व्याख्यान झाले. जळगावमधील कांताई सभागृह श्रोत्यांच्या गर्दीने खचाखच भरले होते. टाचणी पडेल आणि तिचा आवाज ऐकू येईल अशा शांततेत जळगावकरांनी गायकवाड यांच्या सेवा उद्योग समुहाची यशसूत्रे ऐकली. गायकवाड यांच्यासोबत प्रश्नोत्तराचा तासही रंगला. रोटरी क्लब जळगावतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने हणमंत गायकवाड यांच्या सेवा उद्योगातील यशसूत्रे समोर आली. त्याचा धावता आढावा ...