![]() |
| दीप प्रज्ज्वलन करताना मान्यवर वक्ते |
जळगाव शहरात विचारांची
सकारात्मकता सुरू करणारा एक चांगला कार्यक्रम दि. १७ जुलैला झाला. “माय सीटी ... माय ड्रिम” या उपक्रमांतर्गत “जळगावच्या
विकासात गुरुंची आवश्यकता” या
विषयावर शहरातील ८ मान्यवर आणि मान्यवर अध्यक्ष अशा ९ जणांनी विचार मांडले. तब्बल
सव्वा तीन तास चालेल्या या कार्यक्रमास श्रोता म्हणून किमान ५०० वर नागरीक उपस्थित
होते. कार्यक्रम लांबला असे मुद्दाम म्हणणार नाही. कारण, ८ विषयांवर ८ वक्ते किमान
१५ मिनिटे बोलले तरी दोन तास वेळ लागणार हे नक्की होते. या सोबत इतर बाबींसाठीही
वेळ द्यावा लागतो. म्हणजेच ३ तास आपल्याला “कांताई”
सभागृहात बसावे लागेल हा हेतू निश्चित करून बहुतांश श्रोते आले होते. लक्षवेधी बाब
म्हणजे, युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.








