Monday, 18 July 2016

... तरीही जळगाव आमच्या आवडीचे !!!

दीप प्रज्ज्वलन करताना मान्यवर वक्ते
जळगाव शहरात विचारांची सकारात्मकता सुरू करणारा एक चांगला कार्यक्रम दि. १७ जुलैला झाला. माय सीटी ... माय ड्रिम या उपक्रमांतर्गत जळगावच्या विकासात गुरुंची आवश्यकता या विषयावर शहरातील ८ मान्यवर आणि मान्यवर अध्यक्ष अशा ९ जणांनी विचार मांडले. तब्बल सव्वा तीन तास चालेल्या या कार्यक्रमास श्रोता म्हणून किमान ५०० वर नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम लांबला असे मुद्दाम म्हणणार नाही. कारण, ८ विषयांवर ८ वक्ते किमान १५ मिनिटे बोलले तरी दोन तास वेळ लागणार हे नक्की होते. या सोबत इतर बाबींसाठीही वेळ द्यावा लागतो. म्हणजेच ३ तास आपल्याला कांताई सभागृहात बसावे लागेल हा हेतू निश्चित करून बहुतांश श्रोते आले होते. लक्षवेधी बाब म्हणजे, युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.  

Saturday, 16 July 2016

समांतर रस्तेही लोकसहभागातून शक्य

जळगाव शहरातून जाणारा महामार्ग एएच ४६ हा नेहमी होणाऱ्या अपघातांमुळे पादचारी तथा वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. जळगाव शहर व लगतच्या परिसरात वर्षभरात साधारणपणे ३५० ते ४०० अपघात होतात. त्यात १३० ते १५० लोकांचा बळी जातो. लागोपाठ अपघातांची मालिका घडली की, वृत्तपत्रांमध्ये दोन-तीन दिवस वृत्तमालिका सुरू असते. नंतर पुन्हा विषय थंडावतो पुढच्या अपघातापर्यंत. 


Wednesday, 13 July 2016

भाजपच्या गोटात काय चालले आहे ?


मंत्री गिरीश महाजन आणि भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ
व्हाट्स ऍपच्या विविध गृपमध्ये आज दुपारी चोपडा येथील पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे वृत्त फिरत होते. अवघ्या दोन महिन्यांत किसन नजनपाटील यांची बदली होत असल्याचे सांगण्यात येते. थेट बदलीऐवजी सक्तीच्या रजेवर पाठविणार असे सांगण्यात येत आहे. या विषयावर एसपी डॉ. जालींदर सुपेकर यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी चुप्पी साधली. कोणताही खुलासा केला नाही. दरम्यान, चोपडा येथील भाजपच्या समर्थकांचा पीआय किसन नजनपाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असून पोलीस ठाण्यात आणि परिसरात अवैध धंदे चालतात असे त्यांचे म्हणणे आहे. पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे प्रकरण भाजपसाठी त्रासाचेच दिसत आहे. पक्षातर्फे कोणतही बाजू सध्यातरी समोर आलेली नाही. 

Tuesday, 12 July 2016

राजकिय नेत्यांच्या वादग्रस्त फोटोंचे पुराण !

गुलाबराव पाटील - सुरेशदादा जैन भेट
(कृपया मजकूर कॉपी पेस्ट करू नये. इतरांना ब्लॉगची लिंक पाठवावी.)

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे पहिल्यांदा जळगावात येवून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी राज्यमंत्री पाटील आणि घरकूल घोटाळ्याच्या आरोपांतर्गत कारागृहात असलेले सुरेशदादा जैन यांच्या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले. या छायाचित्राने अनेक प्रश्न निर्माण केले. पाटील हे मंत्री झाल्यानंतरची ही भेट आहे का ? कुठे भेट झाली ? न्यायालयात की कारागृहाच्या बाहेर ? राज्यमंत्र्याने आरोपावरून कारागृहात असलेल्या व्यक्तिस भेटणे योग्य की अयोग्य ? असे विषय यातून निर्माण झाले.  

Saturday, 9 July 2016

आग बुझानेवाले यहाँ बहुत है ...!!!

सर्व धर्मिय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईद मिलन सोहळा

जळगावचा नवा सामाजिक पॅटर्न

जळगाव शहरात रमजानचे रोजे सुरू असताना व्हाट्स ऍपच्या माध्यमातून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच कावाई करून संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करीत परप्रांतातील संशयित आरोपींना अटक करून जळगावात आणले. वातावरण तंग असताना मुस्लिम समाजातील काही मंडळींनी युवकांचे माथे भडकावल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणे आणि नंतर गोलाणी संकुलात हिंसाचाराचा व दहशतीचा प्रकार घडला.

Friday, 8 July 2016

“मंत्री गुलाबभू” जरा जपूनच !!

मंत्री गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस
(मजकूर कॉपी पेस्ट करू नका ... वाटले तर लिंक फॉर्वर्ड करा ... लेखातील संदर्भ वापरले तर तसे लिहा...)


 निवडणुकीत तीन विजय आणि एक पराभव पचून आजही लढवय्या नेते अशी प्रतिमा असलेल्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना अखेर राज्याच्या युतीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळाले आहे. ज्या परिस्थितीत गुलाबभू मंत्री झाले ती फारशी अनुकूल नाही. परिस्थिती कशी प्रतिकूल आहे हे शांतपणे समजून घेतले तरच राज्यमंत्रीपदाचा जिल्हा, मतदारसंघ व कार्यकर्त्यांसाठी उपयोग करून घेता येईल. परिस्थिती समजून घेणे जेवढे गुलाबभू यांना गरजेचे आहे तेवढेच ते त्यांच्या भोवतीच्या कार्यकर्त्यांसाठीही आवश्यक आहे. 

Saturday, 2 July 2016

जळगाव मनपात विकासपर्व सुरू व्हावे !

कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकनियुक्त प्रतिनिधी आणि सरकार नियुक्त अधिकारी यांच्यात समन्वय असावा लागतो. याशिवाय, मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाचेही संबंधितांवर अप्रत्यक्ष नियंत्रण असते. या चारही संबंधात दुरावा निर्माण झाला की नागरी विकास योजनांचा बट्याबोळ होतो. सुमारे पाच लाख जळगावकर गेले काही वर्षे हेच अनुभवत आहेत. आता १६ दिवसांच्या अंतराने नव्याने नियुक्त दुसऱ्या आयुक्तांनी सकारात्मक पाऊले उचलत लोकप्रतिनिधींसोबत काम करण्याची भूमिका घ्यायला हवी. जिल्हाधिकाऱ्यांनीही महानगर पालिकेला निधी मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. सरकारकडून काही अडचणी येणार नाहीत, असे दिसते. जळगाव मनपात विकासपर्व सुरू होण्यास प्रारंभ झाला असे आज तरी दिसत आहे,  

Wednesday, 29 June 2016

दादा आणि ताई जोडी न्यारी ...!!!

हेमाताई आणि भरतदादा
खान्देशी मातीत नाती पट्कन रुजतात. आई, बाबापेक्षा दादा आणि ताई ही नाती सर्वसामान्य होतात. कोण्याही अनोळखी माणसाचा एखाद्या कार्यातून संपर्क आला तरी त्याला दादा आणि महिलेस ताई म्हणणे ही खान्देशी परंपरा. आंग्ल परंपरेत अन्कल, अन्टी म्हणत नाते जोडतात. हिंदी भाषिक परंपरेत माणसाला भाईसाहब म्हटले जाते आणि महिला भाभीजीच ठरते. खान्देशात मात्र बहिणाबाईच्या अहिराणीत सुद्धा काहुन रे दादा आणि कसाले ताई असेच म्हणतो. 

Thursday, 23 June 2016

पावसासाठी शहाणपण

पाऊस पाडण्यासाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टर
जळगाव जिल्ह्यात पावसाने ताण दिली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस नाहीच. शेतकऱ्यांसह साऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. पेरण्यांची काहीही तयारी नाही. बियाण्यांच्या दराचाही घोळ आहेच. बाजारपेठेतही हालचाल नाही. राजकारण हे क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रात वातावरण डल, निस्तेज आहे.

पाऊस लांबला की, देवाधर्माचा धावा सुरू होतो. पाखंडी लोकांचे फावते. मग सुरू होतात अंधश्रद्धेचे प्रयोग. अगदी पर्जन्ययागापासून, महादेवाचा गाभारा पाण्याने भरणे, गणपती पाण्यात बुडवून ठेवणे किंवा गावभर धोंडी मिरवणे. बेकडाचे लग्न लावण्याचा महामूर्ख प्रयोगही होतो. पावसासाठी सामुहिक प्रार्थनेचाही कार्यक्रम घेतला जातो. हे आहेत नेहमीचे अनुभव. यातील होम हवनचा पर्याय चाळीसगाव येथे अलिकडे झाला. सामुहिक प्रार्थनेचे इतर जिल्ह्यातील एक दोन ठिकाणचे फोटो व्हायरल होत आहेत. जसा जसा पाऊस लांबेल तसे इतर प्रयोग सुरू होतील.

Wednesday, 15 June 2016

जळगावच्या मेहरुण तलावाने दिला सकारात्मक लोकसहभागाचा धडा

जळगावकरांना समुह विकासासाठी एकत्र येण्याची कार्यशैली व मानसिकता बदलावी लागणार आहे. जळगाव शहर हे केवळ बोलून सुंदर होणार नाही तर ते सुंदर करण्यासाठी साऱ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहे. समुह आणि सामुहिक विकासात लोकसहभाग, लोकवर्गणी व लोकलेखा मूल्यांकन आवश्यक असते. त्याची फल स्वरुप अनुभुती याचवर्षी मेहरूण तलाव तुडुंब भरल्यानंतर प्रत्येक जळगावकराला येणार हे निश्चित. म्हणून म्हणावेसे वाटते की, एका तलावाचे खोलीकरण समाजाला सभ्यता आणि सहृदयता शिकवून देत आहे. आता आपण एकत्र येवून मनामनांतील गाळ उपसण्याची गरज आहे. हे काम यंत्राद्वारे होवू शकत नाही. ते आपणच आपले केले पाहिजे.