![]() |
| एकनाथराव खडसे .....गुलाबराव पाटील |
Saturday, 26 December 2015
‘स’कार पर्वाचा प्रारंभ हवा!
Saturday, 19 December 2015
मॅरेथॉनचा ‘सेलेब्रिटी शिलेदार’
गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अवघड मॅरेथॉनचे २१ किलोमीटरचे अंतर पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करण्याचे यश जळगावचे युवा आयकॉन तथा उद्योगपती किरण बच्छाव यांनी निश्चयाने साधले आहे. धावण्याच्या जगात जळगावचा पहिला ‘सेलेब्रिटी शिलेदार’ म्हणून त्यांची नोंद झाली आहे. यापुढे शक्य त्या मॅरेथॉनमध्ये धावायचे असे त्यांनी ठरविले आहे. साहसी खेळाच्या प्रकारात समावेश असलेल्या मॅरेथॉनच्या नव्या क्षेत्राकडे किरण बच्छाव यांनी इतरांचेही लक्ष वेधले आहे...
Saturday, 12 December 2015
गुलाबराव पाटीलको गुस्सा क्यों आता है ?
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या बहराचा काळ असताना गुलाबराव पाटील यांचे नतृत्व पुढे आले. रस्त्यावरचा आणि सतत लढाऊबाण्याने काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची बराचकाळ ओळख होती. लागोपाठ दोनवेळा आमदारकी मिळाली. मुंबईवार्या करणार्या गुलाबरावांनी मतदार संघातील विकास कामांसाठी मंत्रालयात कधी पाठपुरावा केला असे आढळले नाही. नंतर व्हायच्या त्या परिणामातून आमदारकी गेली. पाचवर्षे गुलाबराव राजकिय वनवासात होते. आता पुन्हा नशिबाने साथ दिली म्हणून गुलाबराव आमदार आहेत. राज्यातील सत्तेच्या सारीपाटात मंत्रिपदाची खूर्ची मिळण्याची संधी त्यांना दिसते आहे. पण, टोकाचा विरोध करून आणि हलके मुद्दे घेवून गुलाबरावांना साध्य काय करायचे आहे? हा खरा प्रश्न आहे. वारंवार बोलघेवडेपणा करून आपल्याच व्यक्तिमत्वाला खुजे ठरविणार्या गुलाबरावांना प्रश्न विचारावासा वाटतो, ‘गुलाबरावको गुस्सा क्यों आता है?’
Saturday, 28 November 2015
सोंगाड्या आमिर खान!
बालिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून खानावळींचे वर्चस्व आहे. अभिनयाच्या गुणवत्तेवर आणि ‘अंडरवर्ल्ड’ शी असलेल्या आर्थिक संबंधातून खानांची किती आणि कुठे चलती आहे, हा चौकशीचा तसाच शोधाचा मुद्दा आहे. चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत कोणत्या खानाचे कोणाशी कसे लागेबांधे असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खानावळ मंडळी पाकिस्तानच्या कलावंतानाही बॉलिवूडमध्ये सहज घुसवून टाकतात. खानावळीच्या गोतावळ्यात ‘परफेक्टनिस्ट’ म्हणून लौकिक मिळवणारा आमिर खान सध्या तमाशातील सोंगाड्यासारखे काम करीत आहे. फरक एवढाच की, तमाशातला सोंगाड्या प्रामाणिकपणे रसिकांना हसवायचे काम करतो तर, आमिरने वठविलेला सोंगाड्या जगभरात भारताच्या साहिष्णू प्रतिमेला धक्का पोहचवून देशवासियांना ‘लाजवायचे’ काम करीत आहे.
Tuesday, 24 November 2015
आपला तो बाळासाहेब, दुसऱ्याचा तो कार्टा...
आपला तो बाळासाहेब, दुसर्याचा तो कार्टा
![]() |
| बीमा भारती |
यावर मत मांडताना पहिला मुद्दा पाहू. महाराष्ट्राच्या प्रभावशाली मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील यांचे नाव घेतले जाते. मात्र, वसंतदादा अल्पशिक्षित होते. त्यांनी आपले सामाजिक भान आणि अनुभव याच्या जोरावर मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. याशिवाय, इतरही अनेक लोकप्रतिनिधींचे शिक्षण कमी असतानाही त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची नोंद इतिहासात झालेली आहे. त्यात सविस्तर जाण्याचे कारण नाही.
Thursday, 22 October 2015
सोने लुटण्याचा अन्वयार्थ
दस-याच्या दिवशी सोने लुटणे ऐवजी सोने वाटायला जावू, असा विचार आमचे सुधारणावादी मित्र मांडतात. मात्र ही विद्वान मंडळी लुटणे या शब्दांचा केवळ भाषा शास्त्रीय आणि कृतीशील अर्थ लक्षात घेतात. जसे लूट म्हणजे चोरी, हिसकावणे, जबरीने नेणे वगैरे. हा भाषीक व कृतीदर्शक अर्थ आहे.
लुटणे किंवा लुटविणे याला आनंद देणे, समर्पण करणे, दुसऱ्यावर ओवाळणे, आनंदात किंवा सुखात डुंबविणे असाही भावार्थ आहे. आजच्या जमान्यात 'जो मेरा है वो तेरा है और जो तेरा है वो मेरा है' ही भावना लूट आणि लुटविणे याविषयी अधिक प्रभावीपणे भावार्थ स्पष्ट करते.
लुटणे किंवा लुटविणे याला आनंद देणे, समर्पण करणे, दुसऱ्यावर ओवाळणे, आनंदात किंवा सुखात डुंबविणे असाही भावार्थ आहे. आजच्या जमान्यात 'जो मेरा है वो तेरा है और जो तेरा है वो मेरा है' ही भावना लूट आणि लुटविणे याविषयी अधिक प्रभावीपणे भावार्थ स्पष्ट करते.
असुरोंके इतिहासका पुनर्लेखन जरुरी है ?
आज विजयादशमीका पावन पर्व है l असत्यपर सत्यकी जीत या बुराईपर भलाईकी मात या अधर्मपर धर्मकी जीत के आनंद स्वरूप आज रावण दहन किया जाएगा l रावण असूर और मर्यादा उल्लंघित विद्वान पंडित का प्रतिक है l राम सूर और मर्यादा पुरूषोत्तम का प्रतिक है l देशभरमें बहुतांश जगहपर आज रावणके प्रतिमाका दहन किया जाएगा l लेकिन, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचलप्रदेश आदी कई प्रांतमे रावण, महिषासूर या होलिका दहन नही किया जाता, यहभी एक वास्तव दृष्टीकोन है l ऐसा क्यूं है, यह सत्य जाननेकी कोशिश करनेपर संबंधित गाव या प्रांतके स्थानिय लोक असुरोंका गुणगान करते हुए दिखाई देते है l याफिर, वे स्वयंमकोही असूरोंका वंशज मानते l
Saturday, 3 October 2015
मातीचे आख्यान
माणूस जेव्हा आईच्या गर्भात आकाराला येत असतो तेवढाच काळ तो अधांतरित असतो. जन्माला आल्यानंतर माणसाचे आणि जमिनीचे नाते घट्ट जमते. माणसाचे पाय जमिनीवर हवेत हा वाक्प्रचार यातूनच तयार झाला. माणसाला पहिली चव मातीचीच कळते. लहानपणी तो न कळत माती चाखतो. माणसाला ओल्या मातीचा गंध हवाहवासा वाटतो. माणसाच्या सुबत्तेचे इमले मातीवरच उभारले जातात. अंतिम समयी अंत्यसंस्कार किंवा दफनविधी होवून माणूस मातीतच विलीन होतो. मातीची ही कहाणी कधी रोचक तर कधी स्तंभित करणारी...Saturday, 26 September 2015
टगेगिरीला ‘टॅग’
राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिसर्या क्रमांकाचे पॉवरफूल्ल नेते अजित पवार सध्या अडचणीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात विविध सरकारी-सहकारी संस्थांमध्ये काम करणार्या आजी-माजी पदाधिकार्यांनी केलेले आर्थिक अनियमीततेचे काही प्रकार समोर आले आहेत. ‘महानंद’ प्रकरणी दुग्ध विकासमंत्री एकनाथराव खडसे, सिंचन प्रकरणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राज्य शिखर बँक प्रकरणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशीचे सत्र सुरू केले आहे. या चौकशांमध्ये अजित पवार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नंतर दिसून येईल. तूर्त आरोपांच्या जंत्रीला म्हणजे, राजकारणातील ‘टगेगिरी’ला कायद्यांचा ‘टॅग’ लावण्याचा प्रकार सरकारने सुरू केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)







