Saturday, 28 November 2015

सोंगाड्या आमिर खान!

बालिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून खानावळींचे वर्चस्व आहे. अभिनयाच्या गुणवत्तेवर आणि ‘अंडरवर्ल्ड’ शी असलेल्या आर्थिक संबंधातून खानांची किती आणि कुठे चलती आहे, हा चौकशीचा तसाच शोधाचा मुद्दा आहे. चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत कोणत्या खानाचे कोणाशी कसे लागेबांधे असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खानावळ मंडळी पाकिस्तानच्या कलावंतानाही बॉलिवूडमध्ये सहज घुसवून टाकतात. खानावळीच्या गोतावळ्यात ‘परफेक्टनिस्ट’ म्हणून लौकिक मिळवणारा आमिर खान सध्या तमाशातील सोंगाड्यासारखे काम करीत आहे. फरक एवढाच की, तमाशातला सोंगाड्या प्रामाणिकपणे रसिकांना हसवायचे काम करतो तर, आमिरने वठविलेला सोंगाड्या जगभरात भारताच्या साहिष्णू प्रतिमेला धक्का पोहचवून देशवासियांना ‘लाजवायचे’ काम करीत आहे.

Tuesday, 24 November 2015

आपला तो बाळासाहेब, दुसऱ्याचा तो कार्टा...

आपला तो बाळासाहेब, दुसर्‍याचा तो कार्टा

बीमा भारती
बिहारच्या मंत्रिमंडळात लालूप्रसाद यादव यांचे पूत्र तेजप्रताप आणि   तेजस्वी यादव यांचा समावेश झाल्यानंतर दोघांच्या अल्पशिक्षीत असण्यावरून आणि शपथ घेताना झालेल्या चुकीवरून अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रिया सुरू आहेत.  त असावेत की अल्पशिक्षित अथवा अशिक्षित असावेत. दुसरा, शपथ घेताना झालेली चूक ही कितपत गंभीर मानावी ?
यावर मत मांडताना पहिला मुद्दा पाहू. महाराष्ट्राच्या प्रभावशाली मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील यांचे नाव घेतले जाते. मात्र, वसंतदादा अल्पशिक्षित होते. त्यांनी आपले सामाजिक भान आणि अनुभव याच्या जोरावर मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. याशिवाय, इतरही अनेक लोकप्रतिनिधींचे शिक्षण कमी असतानाही त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची नोंद इतिहासात झालेली आहे. त्यात सविस्तर जाण्याचे कारण नाही.

Thursday, 22 October 2015

सोने लुटण्याचा अन्वयार्थ

स-याच्या दिवशी सोने लुटणे ऐवजी सोने वाटायला जावू, असा विचार आमचे सुधारणावादी मित्र मांडतात. मात्र ही विद्वान मंडळी लुटणे या शब्दांचा केवळ भाषा शास्त्रीय आणि कृतीशील अर्थ लक्षात घेतात. जसे लूट म्हणजे चोरी, हिसकावणे, जबरीने नेणे वगैरे. हा भाषीक व कृतीदर्शक अर्थ आहे.
लुटणे किंवा लुटविणे याला आनंद देणे, समर्पण करणे, दुसऱ्यावर ओवाळणे, आनंदात किंवा सुखात डुंबविणे असाही भावार्थ आहे. आजच्या जमान्यात 'जो मेरा है वो तेरा है और जो तेरा है वो मेरा है' ही भावना लूट आणि लुटविणे याविषयी अधिक प्रभावीपणे भावार्थ स्पष्ट करते.

असुरोंके इतिहासका पुनर्लेखन जरुरी है ?

विजयादशमीका पावन पर्व है l असत्यपर सत्यकी जीत या बुराईपर भलाईकी मात या अधर्मपर धर्मकी जीत के आनंद स्वरूप आज रावण दहन किया जाएगा l रावण असूर और मर्यादा उल्लंघित विद्वान पंडित का प्रतिक है l राम सूर और मर्यादा पुरूषोत्तम का प्रतिक है l देशभरमें बहुतांश जगहपर आज रावणके प्रतिमाका दहन किया जाएगा l लेकिन, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचलप्रदेश आदी कई प्रांतमे रावण, महिषासूर या होलिका दहन नही किया जाता, यहभी एक वास्तव दृष्टीकोन है l ऐसा क्यूं है, यह सत्य जाननेकी कोशिश करनेपर संबंधित गाव या प्रांतके स्थानिय लोक असुरोंका गुणगान करते हुए दिखाई देते है l याफिर, वे स्वयंमकोही असूरोंका वंशज मानते l

Saturday, 3 October 2015

मातीचे आख्यान

माणूस जेव्हा आईच्या गर्भात आकाराला येत असतो तेवढाच काळ तो अधांतरित असतो. जन्माला आल्यानंतर माणसाचे आणि जमिनीचे नाते घट्ट जमते. माणसाचे पाय जमिनीवर हवेत हा वाक्प्रचार यातूनच तयार झाला. माणसाला पहिली चव मातीचीच कळते. लहानपणी तो न कळत माती चाखतो. माणसाला ओल्या मातीचा गंध हवाहवासा वाटतो. माणसाच्या सुबत्तेचे इमले मातीवरच उभारले जातात. अंतिम समयी अंत्यसंस्कार किंवा दफनविधी होवून माणूस मातीतच विलीन होतो. मातीची ही कहाणी कधी रोचक तर कधी स्तंभित करणारी...

Saturday, 26 September 2015

टगेगिरीला ‘टॅग’

राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिसर्‍या क्रमांकाचे पॉवरफूल्ल नेते अजित पवार सध्या अडचणीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात  विविध सरकारी-सहकारी संस्थांमध्ये काम करणार्‍या आजी-माजी पदाधिकार्‍यांनी केलेले आर्थिक अनियमीततेचे काही प्रकार समोर आले आहेत. ‘महानंद’ प्रकरणी दुग्ध विकासमंत्री एकनाथराव खडसे, सिंचन प्रकरणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राज्य शिखर बँक प्रकरणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशीचे सत्र सुरू केले आहे. या चौकशांमध्ये अजित पवार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नंतर दिसून येईल. तूर्त आरोपांच्या जंत्रीला म्हणजे, राजकारणातील ‘टगेगिरी’ला कायद्यांचा ‘टॅग’ लावण्याचा प्रकार सरकारने सुरू केला आहे.

Saturday, 19 September 2015

कृषि, सहकारातील अनेक बदलांचे संकेत

पीक वीमा योजनेत अनेक अडचणी होत्या. त्या विषयी सरकारकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकार लवकरच ‘सर्वंकश पीक वीमा’ योजना आणणार आहे. त्यात पिकाचा १२ महिन्यांचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल-कृषि, दुग्ध आणि मत्स्योत्पादन विकासमंत्री एकनाथराव खडसे यांना आज जळगाव येथे दिली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९९ व्या वार्षिक सभेत खडसे हे बँकेचे संचालक म्हणून सहभागी झाले. या सभेत विविध प्रश्‍नांची उत्तरे देताना आणि समारोपाचे भाषण करताना त्यांनी मोकळेपणाने अनेक विषय मांडले. त्यात सरकारच्या काही नव्या धोरणांचे सूतोवाच त्यांनी केले. काहीत बदल घडविण्याचाही उल्लेख केला.

काँग्रेसमुक्त जिल्हा !

चर्चा करताना दिलीप तिवारी (डाविकडे) भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ (उजविकडे)
धीकाळी सत्तेचा सुवर्णकाळ पाहणारी काँग्रेस (आय) आज जिल्ह्यात ‘गलीतगात्र’ झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘देशाला काँग्रेसमुक्त करा’ असे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले होते. ते आवाहन जळगाव जिल्ह्यातील मतदारांनी शब्दशः खरे करून दाखविले आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार अशा बहुतांश सत्ताकेंद्रातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. याचे एकहाती श्रेय महसूल-कृषिमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना जाते. जळगाव जिल्हा सध्यातरी काँग्रेसमुक्त असून स्व. प्रमोद महाजन यांनी दिलेल्या ‘शत प्रती शत भाजप’ घोषणेचा अनुभव येत आहे.

Saturday, 22 August 2015

मूल्यनिर्धारण हाच कळीचा मुद्दा

ळगाव महानगर पालिकेवर (मनपा) कर्ज-व्याजाचा एकत्रित बोजा सुमारे ४०० कोटींचा आहे. ही देणी तात्काळ व्यवहारातून अदा करायची तर मनपासमोर केवळ दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे, भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तांची  सध्याच्या बाजार मूल्यानुसार भाडेवाढ करणे किंवा त्याच मालमत्तांचा जाहीर लिलाव करणे. दुसरा म्हणजे, मनपाच्या मालमता जसे, भूखंड किंवा इमारती विकणे. याशिवाय, सूचविले जाणारे इतर पर्याय हे कायद्यांच्या चौकटीत वेळकाढू आणि मोठी रक्कम हाती येणार नाहीत असे आहेत. तात्काळ पर्यायांचा विचार केला तर मालमत्तेचे नव्याने भाडे ठरविणे किंवा जाहीर लिलाव करणे अथवा मालमत्ता विकणे यात कळीचा मुद्दा ठरतो तो हाच की, मूल्यनिर्धारणाची किमान (कमीत कमी) मर्यादा काय असावी? याच्याच भोवती मनपातील सत्ताधारी, प्रशासन आणि विरोधक फेरधरून ‘झिम्मा’ खेळत आहेत.

Sunday, 2 August 2015

स्फोटापेक्षा महाभयंकर !

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या खटल्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही याकूब मेमनच्या बचाव आणि समर्थनासाठी उभ्या राहिलेल्या ‘मूठभर’ मंडळींनी हिंदूस्थानातील एकसंघ समाजाची वैचारिक आणि धर्माच्या नावावर विभागणी करून टाकली. याकूब आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांच्या कृत्यामुळे २५७ जणांची हत्या झाली.  तो प्रकार क्रूर होता. पण, याकूबला झालेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर समाज थेट दुभंगला. हा परिणाम त्या स्फोटांपेक्षा महाभयंकर आहे.