Sunday 21 January 2024

कान्हदेशात राम - सीता ...

अयोध्येत आज सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ ला श्रीराम लला मूर्ती स्थापना आणि भव्य मंदिराचे लोकार्पण होत आहे. यानिमित्ताने राम - सीता - लक्ष्मण यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाऊलखुणांचा सविस्तर तपशील देणारा हा लेख...

जळगाव जिल्ह्यातील काही स्थळांचा रामायण कालीन संदर्भ शोधत असताना प्रथम एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे जळगाव जिल्हा हा असिक (ऋषीक) प्रदेशात होता. यात ऋषी म्हणजे, तपस्वी, ध्यान करणारा. ऋषीक म्हणजे तपस्वी - ध्यान करणाऱ्याची निवासाची जागा. जळगाव जिल्हा ही प्राचीन काळी तपोभूमी होती. रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी (वालझिरी (ता. चाळीसगाव), राजा दशरथशी संबंध असलेले ऋषी विश्वामित्र (रामेश्वरम (पळसोद), ता. जळगाव), महाभारत लिहणारे महर्षी व्यास (यावल), राजा दशरथकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेणारे ऋषि अगस्त्य (अगस्ती) (सिंगत, ता. रावेर), ऋषि लोमश (लुणखेडा, ता. रावेर), ऋषि उद्धालाक (उधळी, ता. रावेर), ऋषि शरभंग (चोपडा तालुका), महर्षी कण्व (कानळदा, ता. जळगाव) यांचे आश्रम वा मठ जळगाव जिल्ह्यात होते. भारतातले पहिले गणिती विद्यापीठ पाटणे (चा. चाळीसगाव) येथे भास्कराचार्य यांनी सुरु केले होते. या तपशिलाचे कोणतेही लिखित संदर्भ उपलब्ध नाहीत. वर्षानुवर्षांच्या मौखिक परंपरेतून ऋषी आणि महर्षींची जळगाव जिल्ह्यातील स्थाने चर्चेत आहेत. या संदर्भांचा उल्लेख काही अभ्यासकांनी त्यांच्या शोध वा संशोधन लेखांमध्ये केलेला आहे. ज्या प्रदेशात ऋषी, मुनी वा महर्षींचा निवास होता, त्या प्रदेशात राजा दशरथ आणि रामाच्या आवागमनाचे संदर्भही मौखिक स्वरुपात समोर येतात. रामायण हे सर्वाधिक मौखिक व नंतर स्थानिक भाषांमध्ये लिहिलेले लोकसाहित्य आहे. ज्या प्रदेशातील लोकांना राम जसा भावला तसा तो लेखनातून प्रकटला आहे. म्हणून राम - सीता - लक्ष्मण यांची विविध रुपे लोकसाहित्यातून समोर येतात. संपूर्ण भारतात रामाच्या संदर्भातील काही कथा आणि स्थाने यांची पुनरुक्ती होताना दिसते. विशिष्ट स्थाने, मंदिरे यांच्याविषयी सारख्याच आशयाच्या कथा चर्चेत असतात. जळगाव जिल्ह्यातील रामाच्या पाऊलखुणांविषयी सुद्धा हाच लोकोपवाद असू शकतो. तरीही रामाचा आणि जळगाव जिल्ह्याची संबंध माहित करून घेणे हे प्रचंड आनंद देणारे ठरते.

Wednesday 19 July 2023

चावट आरोपांचा सर्वाधिक त्रास जळगाव जिल्ह्याला ...

 

भाजप नेता किरीट सोमय्या याचे 'चावट हावभाव' असलेली एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात चर्चेत आहे. सोमय्या स्वतःच कॅमेराकडे पाहून तसले हावभाव करतोय. तूर्त त्या क्लिपमध्ये महिला आहे का ? आणि असेल तर सोमय्याने तिला बळजोरी केली आहे का ? हे समोर यायचे आहे. पण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे एक पेन ड्राईव्ह देऊन, सोमय्या यांच्या चावट लिलांच्या आठ तासांच्या क्लिप असून काही मराठी महिलांचा सोमय्याने लैंगिक छळ केला असा दावा, सभागृहात केला आहे. या चावटपणाच्या खेळात माध्यमे कशी बेसावध होतात व राजकारणी कसे खेळून घेतात, हे मला स्वानुभवातून सांगायचे आहे.

Thursday 13 May 2021

आत्म्याच्या मुक्तीचा प्रश्न ...

(वैधानिक इशारा - खालील लेख विज्ञानवादी व अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांची वाचून स्वतःला मनस्ताप करू नये. या लेखाखाली विज्ञान, अंधश्रद्धा वगैरे विषयावर शहाणपणा शिकवणाऱ्या कमेंट करू नये. कारण, आम्हीही विज्ञानवादीच आहोत. 'चला बोलू या ...' या संवाद कार्यक्रमात काही जणांनी कोरोना संसर्गित मृतांच्या अंत्यविधी व इतर कर्मकांड संदर्भात आम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा प्रयत्न आहे.)

Saturday 10 April 2021

मोदी-ठाकरे, जमत नसेल तर राजीनामे द्या !

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीपदाच्या खूर्चीवर बसणारे नेते हे देशाच्या संविधानातील सरकारसंबंधी व्याख्येत 'लोकसेवक' ठरतात. लोकांनी बहुमतदानाद्वारे हे लोकसेवक निवडलेले असतात. पर्यायाने मतदार तथा जनता मालक असते. मंत्री लोकसेवक असतात. प्रशासन हे जनतेचे नोकरदार असतात. संपूर्ण भारत कोरोना महामारीच्या महाभयंकर वावटळीत सापडलेला असताना केंद्र व राज्यातील लोकसेवक-नोकरदार हे प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात अपयशी ठरत आहेत. कोरोनावर प्रभावी ठरेल अशा प्रतिबंधात्मक लसींच्या निर्मितीचे जगातले सर्वांत मोठे केंद्र भारतात असूनही केंद्र व राज्य सरकार लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचे रोजचे निश्चित उद्दिष्ट गाठू शकत नाहीत असे दिसते. याचे अत्यंत खेद व निराशाजनक चित्र महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याची आकडेवारी केंद्र व राज्य सरकारमधील 'नालायक लोकसेवकांकडे' बोट दाखवत आहे.

Saturday 3 April 2021

पाडव्याच्या आधीच पालकमंत्री गुलाबभूकडून विकासनिधीची गुढी !

सत्ता बदल झाल्यानंतर थेट लाभ

३१ मार्चला दिला मनपाला निधी

सोमवारी निविदा होतील फायनल

कलेक्टर, मनपा प्रशासन धन्यवाद

जळगावसाठी मंत्रालयात २ दिवस

गुढीपाडवा दि. १३ मार्चला आहे. त्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा गुलाबभू यांनी जळगाव शहरासाठी ४५ कोटी रुपयांची भरघोस तरतुद केली आहे. त्यातील जवळपास निम्मा २२ कोटी रुपयांचा निधी मनपाच्या खात्यावर वर्ग झाला आहे. उद्या (सोमवारी) शहरातील विकास कामांच्या निविदा काढल्या जातील. गेले ५ वर्ष चमको पुढाऱ्यांनी जळगाव शहरासाठी केलेल्या विशेष अनुदान २५ कोटी आणि जादा अनुदान १०० कोटीच्या थापा नागरिकांनी अनुभवल्या आहेत. अशा कार्यपद्धतीला चपराक आणि जळगाव शहराला प्राधान्य देत गुलाबभू यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या (डीपीडीसी) आतापर्यंतच्या इतिहासात नव्या विक्रमाची गुढी उभारली आहे. यापूर्वी कोणत्याही पालकमंत्र्याने डीपीडीसीच्या माध्यमातून जळगाव शहराला असा आणि एवढा निधी दिलेला नाही. हे का घडले आणि कसे घडले ? हे निरपेक्षपणे सांगायलाच हवे.

Tuesday 23 February 2021

बदअलमी कारभाऱ्यांचे संरक्षणकर्ते राज्य सरकार ...

महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या आघाडी राज्य सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारधारांचे कारभारी आहेत. या कारभाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र व स्वराज्य उभारणीच्या कार्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आघाडी राज्य सरकार टीकविण्याची सर्वाधिक जबाबदारी निभावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवचरित्राची नव्याने संपूर्ण मांडणी करायची आहे. राज्य सरकारमध्ये आपसूक दुय्यम भूमिकेत असलेल्या शिवसेनेला शिवचरित्रातील जुन्या-नव्या संदर्भात फारसा रस नाही. त्यांचा दृष्टिकोन पक्षाच्या विचारधारेशी संबंधित हिंदू, हिंदवी स्वराज्य या शब्दांचा गरजेनुसार खेळ करण्यात आहे. सरकारी दिनांक की तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी ? याविषयी शिवसेना आजही निर्णय घेऊ शकलेली नाही. शिवसेना कार्यकर्त्यांना आता दोन वेळा शिवजयंती साजरी करावी लागते. मुख्यमंत्री आपले असल्यामुळे सरकारी दिनांकला आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तिथीला. राज्य सरकारमधील काँग्रेसला शिवचरित्रात पूर्वीपासून सर्व धर्म समभाव दिसतो. यवनांच्या पाच शाहींना आव्हान देत शिवाजी महाराजांनी विस्तारलेले स्वराज्य हे कोणत्याही धर्माचे नव्हते, हा विचारही इतिहासाचे नवे अभ्यासक नवा सिद्धांत म्हणून मांडतात. अशा प्रकारे परस्पर टोकांचे विचार असणाऱ्या तीन पक्षांचे कारभारी जनतेसमोर उठता-बसता शिवचरित्रातील सोयीची उदाहरणे मांडत असतात.

Thursday 18 February 2021

छत्रपती शिवाजी महाराज मथुरेत कुठे मुक्कामी होते ?

गेल्या
४०० वर्षांच्या काळखंडात सर्वाधिक लोकप्रिय चरित्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राहिले आहे. शेकडो अभ्यासक व तज्ञ मंडळींच्या लेखनातून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर आले आहेत आणि येत आहेत. उपलब्ध बखरी, कागदपत्रे, आज्ञापत्रे यातील आशय वाचून शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचे विश्लेषण तर्काधारे केले जाते. या अगोदर केलेला तर्क वा मांडणी चुकीची होती असा दावा करीत नवा तर्क मांडला जातो. याच कारणामुळे संपूर्ण जगभरातील अभ्यासकांना भूरळ घालणारे व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराज यांचे आहे.

Monday 8 February 2021

हिंदू समाज खरच सडला आहे का ...?

फोटो १ भीमबेटका गुहाचित्रे
कुण्यातरी २४ वर्षांच्या मुस्लिम मुलाने 'आजचा हिंदू धर्म सडलेला आहे' असा आरोप पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत केला. त्यावरून वादंग निर्माण झालेला आहे. तो मुलगा मुस्लिम असल्यामुळे त्याने केलेल्या आरोपाला धार्मिक द्वेषाची किनार आहे. तो ज्या समाजातून आलेला आहे तो समाज आज कुजलेल्या अवस्थेत असल्याविषयी भाष्य करणे त्याने टाळलेले आहे. कुजणे ही अवस्था सडण्याच्या कितीतरी पुढची आहे. पदार्थ सडू लागला की कालांतराने तो पिचू लागतो. पिचलेल्या पदार्थाला दुर्गंधी सुटते. हळूहळू पदार्थाचा छोटा-छोटा भाग कुजून त्यात अळ्या होतात. अशा कुजलेल्या अवस्थेतील काळा झालेला पदार्थ खड्डा करून गाडावा लागतो. हिंदू समाजाचे असे काही घडण्याची अवस्था आज नक्कीच नाही. 

Sunday 3 January 2021

नाथाभाऊ हे अवलक्षण कशासाठी ?

मुक्ताईनगरचे लढवय्ये नेते एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ यांची विरोधकांवर आरोप करणारी तोफ थंडावली आहे. नाथाभाऊंना कोरोना त्रास देतोय. त्यांना खरोखर कोरोनाची लागण झाली किंवा नाही ? याची लक्षणे सध्या तरी समोर नाहीत. मात्र 'ईडी' (Enforcement Directorate तथा अंमलबजावणी संचालनालय) ची नोटीस आल्यानंतर मुंबईकडे गेलेल्या नाथाभाऊंचे कोणतेही वक्तव्य आलेले नाही. त्यातच नाथाभाऊंना झालेल्या (बहुतेक दुसऱ्यांदा) कोरोना संसर्गाविषयी जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित करून नाथाभाऊंची 'हात दाखवून अवलक्षण' अशी अवस्था निर्माण केली आहे. यातील अवलक्षण हा शब्द नाथाभाऊंच्या २/४ समर्थक, पंटर व तथाकथित समर्थकांच्या डोक्यावरून जाईल.

Friday 25 December 2020

जळगावचे बीभत्स राजकारण ...

 जळगाव जिल्ह्याचे राजकारण २/४ पुढाऱ्यांनी कमरेच्या खाली नेवून ठेवले आहे. जाहीरपणे सांगितले जाते आहे, 'आमच्याकडे सीडी आहे. आमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे.' अर्थातच अशा डिजिटल मीडिया सेव्हरमध्ये भजन-कीर्तनच्या व्हिडिओ क्लिप असणार नाहीत. स्त्री-पुरुषाच्या एकांतातील कमरेखालच्या खेळाच्या व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता जास्त आहे. बहुधा तो खेळही संमतीचा मामला असेल. बलात्कार वा ब्लैकमेलचा प्रकार असण्याची शक्यता तशी धूसरच. तरीही 'सीडी वा पेनड्राईव्ह आमच्याकडे आहे' असे सांगून सतत जाहीरपणे धमकावत राहणे म्हणजेच राजकारणाचास्तर कमरेखाली नेणे होय. पुढाऱ्यांच्या अशा कमरेखालच्या राजकारणाचा सामान्य जळगावकरला वीट आला आहे.