Thursday 13 May 2021
आत्म्याच्या मुक्तीचा प्रश्न ...
Saturday 10 April 2021
मोदी-ठाकरे, जमत नसेल तर राजीनामे द्या !
Saturday 3 April 2021
पाडव्याच्या आधीच पालकमंत्री गुलाबभूकडून विकासनिधीची गुढी !
सत्ता बदल झाल्यानंतर थेट लाभ
३१ मार्चला दिला मनपाला निधी
सोमवारी निविदा होतील फायनल
कलेक्टर, मनपा प्रशासन धन्यवाद
जळगावसाठी
मंत्रालयात २ दिवस
गुढीपाडवा दि. १३ मार्चला आहे. त्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा गुलाबभू यांनी जळगाव शहरासाठी ४५ कोटी रुपयांची भरघोस तरतुद केली आहे. त्यातील जवळपास निम्मा २२ कोटी रुपयांचा निधी मनपाच्या खात्यावर वर्ग झाला आहे. उद्या (सोमवारी) शहरातील विकास कामांच्या निविदा काढल्या जातील. गेले ५ वर्ष चमको पुढाऱ्यांनी जळगाव शहरासाठी केलेल्या विशेष अनुदान २५ कोटी आणि जादा अनुदान १०० कोटीच्या थापा नागरिकांनी अनुभवल्या आहेत. अशा कार्यपद्धतीला चपराक आणि जळगाव शहराला प्राधान्य देत गुलाबभू यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या (डीपीडीसी) आतापर्यंतच्या इतिहासात नव्या विक्रमाची गुढी उभारली आहे. यापूर्वी कोणत्याही पालकमंत्र्याने डीपीडीसीच्या माध्यमातून जळगाव शहराला असा आणि एवढा निधी दिलेला नाही. हे का घडले आणि कसे घडले ? हे निरपेक्षपणे सांगायलाच हवे.
Tuesday 23 February 2021
बदअलमी कारभाऱ्यांचे संरक्षणकर्ते राज्य सरकार ...
महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या आघाडी राज्य सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारधारांचे कारभारी आहेत. या कारभाऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र व स्वराज्य उभारणीच्या कार्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आघाडी राज्य सरकार टीकविण्याची सर्वाधिक जबाबदारी निभावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवचरित्राची नव्याने संपूर्ण मांडणी करायची आहे. राज्य सरकारमध्ये आपसूक दुय्यम भूमिकेत असलेल्या शिवसेनेला शिवचरित्रातील जुन्या-नव्या संदर्भात फारसा रस नाही. त्यांचा दृष्टिकोन पक्षाच्या विचारधारेशी संबंधित हिंदू, हिंदवी स्वराज्य या शब्दांचा गरजेनुसार खेळ करण्यात आहे. सरकारी दिनांक की तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी ? याविषयी शिवसेना आजही निर्णय घेऊ शकलेली नाही. शिवसेना कार्यकर्त्यांना आता दोन वेळा शिवजयंती साजरी करावी लागते. मुख्यमंत्री आपले असल्यामुळे सरकारी दिनांकला आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तिथीला. राज्य सरकारमधील काँग्रेसला शिवचरित्रात पूर्वीपासून सर्व धर्म समभाव दिसतो. यवनांच्या पाच शाहींना आव्हान देत शिवाजी महाराजांनी विस्तारलेले स्वराज्य हे कोणत्याही धर्माचे नव्हते, हा विचारही इतिहासाचे नवे अभ्यासक नवा सिद्धांत म्हणून मांडतात. अशा प्रकारे परस्पर टोकांचे विचार असणाऱ्या तीन पक्षांचे कारभारी जनतेसमोर उठता-बसता शिवचरित्रातील सोयीची उदाहरणे मांडत असतात.
Thursday 18 February 2021
छत्रपती शिवाजी महाराज मथुरेत कुठे मुक्कामी होते ?
Monday 8 February 2021
हिंदू समाज खरच सडला आहे का ...?
![]() |
फोटो १ भीमबेटका गुहाचित्रे |
Sunday 3 January 2021
नाथाभाऊ हे अवलक्षण कशासाठी ?
मुक्ताईनगरचे लढवय्ये नेते एकनाथराव खडसे तथा नाथाभाऊ यांची विरोधकांवर आरोप करणारी तोफ थंडावली आहे. नाथाभाऊंना कोरोना त्रास देतोय. त्यांना खरोखर कोरोनाची लागण झाली किंवा नाही ? याची लक्षणे सध्या तरी समोर नाहीत. मात्र 'ईडी' (Enforcement Directorate तथा अंमलबजावणी संचालनालय) ची नोटीस आल्यानंतर मुंबईकडे गेलेल्या नाथाभाऊंचे कोणतेही वक्तव्य आलेले नाही. त्यातच नाथाभाऊंना झालेल्या (बहुतेक दुसऱ्यांदा) कोरोना संसर्गाविषयी जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित करून नाथाभाऊंची 'हात दाखवून अवलक्षण' अशी अवस्था निर्माण केली आहे. यातील अवलक्षण हा शब्द नाथाभाऊंच्या २/४ समर्थक, पंटर व तथाकथित समर्थकांच्या डोक्यावरून जाईल.