Wednesday, 3 June 2020

कर्तव्य भावनेतून सामाजिक दायित्व

कोरोना विषाणूचा सामुहिक स्वरुपातून होणारा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात किमान ७२ दिवसांचा लॉकडाऊन संपला आहे. नव्या संहारक विषाणुंमुळे उद्भवलेल्या महामारीच्या भीतीपोटी देशातील सार्वजनिक अर्थ, उद्योग, व्यापार व त्याअनुषंगाने होणारे व्यवहार बंद झाले. ही स्थिती किती दिवस असेल याची शाश्वथीती नव्हती. पण साथरोग नियंत्र कालावधी साधारणतः ७२/७६ दिवसांचा असेल हा अंदाज होता. पंतप्रधानांनी दि. ३१ मेस पहिला अनलॉकडाऊन घोषीत केला आणि जवळपास ७२ दिवसांची अनिश्चितता संपली. यानंतर अऩेक ठिकाणी गरजुंसाठी सुरु असलेले मदत काय्त थांबविण्यात आले आहे.