![]() |
कोरोनातून बरे होणाऱ्यांसाठी कोणते आहेत प्रश्न ? |
Tuesday, 19 May 2020
कोरोनातून बरे झालेल्यांची समाजवापसी ?
Sunday, 17 May 2020
कोरोनासोबतची जीवन व कार्यशैली !
संपूर्ण जगाला भयंकर साथीच्या संसर्गातून घोषीत बंदीच्या स्थितीत नेणारा कोरोनाचा विषाणू पुढे किती काळ मानवाला घाबरवत राहील याचा अंदाज लावणे आज शक्य नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गेले ६० दिवस संपूर्ण भारतातील जनजीवन ठप्प करण्यात आले आहे. त्यात आणखी १५ दिवसांचा कालावधी वाढवला आहे. साथरोग रोखण्यासाठी अपेक्षित ७५/७६ दिवसांची मर्यादा दि. ३१ मे पर्यंत पूर्ण होईल. हे करूनही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईलच याची शक्यता कमीच. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी वा नष्ट करण्यासाठी मुखावाटे घेण्याचे किंवा इंजेक्शन, सलाईनद्वारे टोचून घेण्याचे औषध सध्या तरी जगभरात कुठेही उपलब्ध नाहीच. म्हणजेच आहे त्या स्थितीत पुढील काळात वा दैनंदिन कामे व जबाबदाऱ्यांकडे प्रत्येकाला जावे लागणार आहे. मरणाच्या भीतीपोटी थबकलेल्या जगाला संभाव्य मृत्यू उरावर धरून धावणे सुरू करावेच लागेल. इच्छा असो वा नसो प्रत्येकाला धावावेच लागेल.
Wednesday, 13 May 2020
नाथाभाऊ, त्या ५५ फाईलींचा विषय काय ?
![]() |
नाथाभाऊ किती दिवस पक्षांतरासाठी वेळ पाहाणार ? |
भाजपची मोठी गंमत आहे. या पक्षात सेनानिवृत्ती ही गोड बोलून व संभ्रमित ठेऊन दिली जाते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह ही ठराविक उदाहरणे. उत्तर महाराष्ट्रात धरमचंद चोरडीया, डॉ. दौलतराव आहेर, डॉ. विजय गावित ही काही उदाहरणे. भाजपत नेतेपदी असताना स्वतः ठरवून निवृत्ती निश्चित केल्याची केवळ तीन उदाहरणे आहेत. पहिले अटल बिहारी वाजपेयी, दुसरे उत्तमरावनाना पाटील यांचे. या दोघांनी सर्वोच्च पदांवर असताना स्वतःच बाजूला होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांना कोणतीच रांग दाखविण्याचे धारिष्ट्य कोणाचेही झाले नाही. तिसरे उदाहरण सुषमा स्वराज यांचे आहे. पक्षाची सत्ता असताना मंत्रीपद नाकारुन त्या बाजूला झाल्या. ही उदाहरणे सोडली तर बाकीच्यांना बाजूला सारायला अगोदर दुर्लक्ष, नंतर कुजबूज, त्यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणणे, नंतर सभा, बैठकांमधून टाळणे, हळूहळू आरोपांची तीव्रता वाढवणे, दोघा-तिघांनी थेट आरोप करणे, आरोपांना उत्तरे देण्यास बाध्य करणे आणि नंतर स्वतःच स्वतःची गच्छंती घडवून आणणे हे सूत्र वापरले गेले आहे.
भाजपतही सत्तेत कमबैक करता येते अशी उदाहरणे आहेत. त्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर होते. त्यांनाही पक्षाने काही काळ बाजूला सारले. कुजबूज मोहिम सुरू झाली. पण फुंडकर यांनी मौन पाळले. त्यांनी हल्ले-प्रतीहल्ले केले नाही. अखेरीस त्यांना मंत्रीपद मिळाले. फुंडकर मौन राखून कमबैक करु शकले. नाथाभाऊंना मौनाचे महत्त्वच समजले नाही. मंत्रीपदाच्या अवघ्या दीडवर्षांत इतरांकडून किंमत वसूल करीत नाथाभाऊंनी कुटुंबासह सत्तेचा अमर्याद उपभोग घेतला. नाथाभाऊंकडे १४ खात्यांचे मंत्रीपद होते. त्यात सहकार, महसूल, कृषी खाते होते. जळगाव जिल्हा बँक, जळगाव जिल्हा दूध संघात ठाण मांडून बसलेल्या व अनेक घोटाळे केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या फायली मंत्रालयात होत्या. चौकश्या आणि वेळप्रसंगी कारागृहाची भीती असल्यामुळे अनेक प्रस्थापितांनी नाथाभाऊसमोर शेपट्या घातल्या. फायलींच्या बळावरच नाथाभाऊंना घरात पदे आणता आली.
नाथाभाऊंसारखा अनुभवी नेता फायलींचे महत्त्व जाणतो. नाथाभाऊंनी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या काही व्यवहारांच्या ५५ फाईल्स अस्तित्वात आहेत, असे एक कुजबूज अभियान सध्या चर्चेत आहे. भाजपत एवढा अपमान सहन करुनही नाथाभाऊ पक्ष का सोडत नाहीत ? असा प्रश्न चर्चेत येतो तेव्हा या फाईलींची भीती उरावर असते म्हणे. सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनीही कधी तरी या फायलींचा उल्लेख केला होता. यातील काही विषय केंद्र सरकारमधील मंत्रालयांशी संबंधित आहेत. ईडी सारखी यंत्रणा कधीही मागे लावून उत्पन्नाचे उत्खनन करता येते. बहुधा याच चिंतेतून नाथाभाऊ भाजप सोडू शकत नाहीत. ही आगतिकता ध्यानी असल्यामुळे भाजपतील छुटपूटमंडळीही नाथाभाऊंना टपली मारत आहेत.
नाथाभाऊ भाजपने केलेल्या अन्यायावर भरभरुन बोलतात. दाऊदच्या पत्नीला फोन कॉल या तथ्यहिन प्रकरणात नाथाभाऊंविषयी जनतेत सहानुभूती होती. ती आजही आहे. पण अंबानी, अदानी या उद्योजकांशी का बिनसले ? वक्फ बोर्ड जमीन भानगडी काय ? भोसरीत जागा घ्यायला ४/५ कोटी कुठून आणले ? काही व्यवहारात बोगस कंपनी कोणत्या ? अशी काही माहिती नाथाभाऊंनी स्वतःच सांगून टाकायला हवी. जेणे करुन ज्या ५५ फाईलींची चर्चा आहे, तिला पूर्णविराम मिळेल. चंद्रकांतदादा व गिरीशभू यांनी नाथाभाऊंच्या प्रतिमा भंजनाला थेट हात घातला आहे. अशावेळी नाथाभाऊ कुंपणावरुन किती दिवस बचाव करणार ? एकदा जाहीरपणे त्या ५५ फायली आहेत की नाही, हे सांगून भाजपसंदर्भातील निर्णय घ्यायलाच हवा. नाथाभाऊंना कोणीही टपली मारावी, हे पाहणे व वारंवार तसे लिहिणे क्लेषकारक आहे.
नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे
नाथाभाऊंनी भाजप सोडून कोणत्या पक्षात जावे ? याविषयी महासर्वेक्षण घेतले होते. जवळपास १५० वर समर्थकांनी पर्याय सूचविले. यात धक्कादायक बाब हीच की, भाजपने नाथाभाऊला भरपूर दिले. आता त्यांनी गप्प बसावे, असे मत व्यक्य करणारे ७५ आहेत. नाथाभाऊंनी शिवसेनेत जावे असे ३० जणांना वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय २५ जण सूचवतात. उरलेल्या २० मध्ये काँग्रेसहसह इतर पर्याय आहे. याचा निष्कर्ष एवढाच की, नाथाभाऊला पक्षाने भरपूर दिले हे कुजबूज अभियान आता भोंगा अभियान झाल्यानंतर उरलेल्या ७५ मधूनही बहुतांश सहमत होत जातील.
सुरेशदादा खडसेंपेक्षा सरस
सुरेशदादांच्या व नाथाभाऊंच्या राजकीय वाटचालीत अनेक आडवळणे सोबत आली. सुरेशदादांचे राजकारण धाडसाचे राहिले. डंका वाजवून त्यांनी पक्षांतरे केली. नाकावार टिच्चून निवडून येत गेले. जळगाव शहराला विकासाचा चेहरा दिला. अनेक विकास प्रकल्पांच्या फलकावर सुरेशदादांचे नाव आहे. पण नाथाभाऊंनी मंत्रीपदाच्या काळात उभारलेले प्रकल्प कोणते ? ते शोधावे लागतात. भाजप न सोडून आगतिक झालेल्या नाथाभाऊंपेक्षा वारंवार पक्ष बदलून सत्तेत राहिलेल्या सुरेशदादांची कारकिर्द उजवी ठरते. म्हणून आता तरी नाथाभाऊंनी वेळ चुकवू नये, असे समर्थकांना वाटते.
Friday, 8 May 2020
नाथाभाऊ बोलून टाका, 'पक्ष गेला उडत ...'
विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवारी नाकारणे, कन्येला तोंड देखली उमेदवारी देऊन नंतर पराभव घडवून आणणे, लागोपाठ झालेल्या आरोपांची चौकशी करुन एकही अहवाल जाहीर न करणे, पक्षाच्या राज्य व जिल्हा सभांमध्ये सन्मानाने सहभाग न देणे अशा मानभंगांच्या अनेक प्रसंगांचे कडू घोट एकनाथराव खडसे यांनी रिचवले आहेत. तरीही विधान परिषदेवर उमेदवारीची आशा बाळगून खडसे रांगेत उभे होते. अखेर उमेदवारी मिळाली नाही. नाथाभाऊंचा संयमाचा बांध पुन्हा फुटला आणि ते बोलले.
Subscribe to:
Posts (Atom)