आ.
पालकमंत्री महोदय गुलाबभू पाटील यांना जयमहाराष्ट्र
एवढ्या जाहिरपणे आपणास पत्र लिहिण्यास
कारण की, कॅबिनेट मंत्री नियुक्ती होऊन तीन महिने व पालकमंत्री होऊन महिनाभर
झाला आहे. एवढ्या काळात कॅबिनेट मंत्री होण्याचा आनंद हा नव्याचे ९० दिवस म्हणून साजरा होत असेल.
आजूबाजूला आता ४/६ समर्थकांचे, हितचिंतकांचे, आडवळणाने लाभ घेणाऱ्यांचे कोंडाळे
तयार झाले असेल. यापूर्वीच्या
पालकमंत्र्यांचा असाच अनुभव आम्हाला आहे. रेस्ट हाऊसला पालकमंत्र्यांच्या कक्षात तासंतास
बसलेले मोजके चेहरे आम्ही पाहिले आहेत. बहुधा असे चेहरे सोबत असल्याशिवाय पालकमंत्री पदालाही
शोभा येत नसावी. पूर्वीच्या काळी राजे, महाराजेंच्या सोबत हाकारे असायचे. 'खबरदार ... होशियार' म्हणायचे काम ते करीत. पोवाडे
गाणाऱ्यांसोबत झिलकरी असतात. 'जी र र ...जी' म्हणायला. आज काल मंत्र्यांभोवती अशी मंडळी लागतेच. ‘दादा, भाऊ आले ... गेले सांगायला’. असो हे विषयांतर झाले.