सोशल मीडियाचे पर्याय असलेल्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये शेअरिंग करणाऱ्या काही मोजक्या सदस्यांना ४ वेगवेगळे आजार बळावल्याचे अनुभवाला येते. हे आजार शाब्दीक स्वरुपातील पोटशूळ, पोटदूखी, अजीर्ण आणि उलट्या या प्रकारातील आहेत. या आजारांची लक्षणे फारच साधी असतात. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स ॲप गृपमध्ये एखाद्या विषयी चांगल्या लेखनाची पोस्ट शेअर केली, की वरील चारही आजारातील रुग्ण सदस्यांची बोटे विरोधासाठी भराभरा किपैडवर चालू पडतात. अमूक व्यक्ती विषयी चांगले लिहिलेच कसे ? या प्रश्नाची अस्वस्थता घेऊन मग पक्ष, समाज, जात आणि नंतर व्यक्तिगत घसरणाऱ्या प्रतिक्रिया सुरु होतात. नुसत्या एक मेसेजने नाही भागले की, मेसेजची मालिका सुरु होते. भाषा हळूहळू अगदीच कुजकट पातळीवर जाते. मग संबंध नसलेल्या घटनांचा, व्यक्तिंचा उल्लेख सुरु होतो. काही उत्साही रुग्ण आपणच लिहिलेल्या पोस्टवर स्वतःच हास्याचे इमोजी टाकतात. असे करणे म्हणजे आजार बोटापासून मेंदूपर्यंत भयंकर बळावल्याचे लक्षण मानावे. अशा लक्षणांचे ४ आजार पुढील प्रमाणे आहेत.
Monday, 29 July 2019
Saturday, 20 July 2019
दोष कोणाला लावणार ?
जळगाव येथील खान्देश सेंट्रल मॉल मधील बीग बाजार मॉल बंद करण्यात आला. व्यवस्थापनाने ३ महिन्यांचे वेतन अगाऊ देऊन मॉलची टाळेबंदी केली. २०० च्या आसपास पुरुष व महिलांचे रोजगार हिरावले गेले. जळगावमध्ये सर्व प्रथम मॉल कल्चर घेऊन आलेल्या विशाल मॉलनेही वर्षा-दीडवर्षांत जळगाव सोडले. तेव्हाही १०० वर जणांचा रोजगार गेला. यापूर्वी ब्लो प्लास्ट कंपनी गेली. कामगार बेकार झाले. रेमंड कंपनीने उत्पादने कमी केली. तेव्हा जळगावमधील कामगार असंतोषाचा भडका उडाला. अशा इतरही घटना आहेत. एकूण परिणाम काय, तर कंपनी बंद आणि कामगार बेरोजगार. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे, जळगावमधील कामगार वा कर्मचारी असंतोषाचा.
Sunday, 14 July 2019
जळगावकर म्हणून घ्यायची पात्रता आहे ?
यावर्षीचा पावसाळा जळगावकरांसाठी मनःस्ताप घेऊन आला आहे. अमृत योजनेच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचा ऊत-मात झालेला आहे. घंटागाड्या जमेल तेवढा कचरा गोळा करीत असल्या तरी लोकांनी कॉलनींच्या मोकळ्या जागेत वा कचरा कुंड्यांजवळ टाकलेला कचरा उचलला जात नाही आहे. अशा स्थितीत जळगाव हे कचरा, घाण, माश्या, डास व मच्छरांचे गलिच्छ शहर झाले आहे. अर्थात, याचा दोष नेहमी प्रमाणे महानगरपालिकेवर फोडला जात असून अमृत योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांचे १२ वाजले असा ढोबळ दोष लावला जातोय. सोशल मीडियातून टीका टीपण्या करताना राजकीय पुढाऱ्यांना टीकेचे धनी केले जात आहे.
Subscribe to:
Posts (Atom)