Thursday, 10 January 2019

'अच्छेदिन' साठी जनआंदोलनाचे विधायक मार्ग ...

(अभिनीत जानेवारी २०१९ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख)
जनतेच्या विविध मागण्यांसाठी जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे जनतेने संघटीत होऊन  जनमनातील असंतोष दर्शविण्याचा अवलंबिलेला कृतीशील मार्ग म्हणजे जनआंदोलन होय. जनआंदोलनाला जनचळवळ किंवा जनसत्याग्रह असेही म्हटले जाते. राज्य घटनेच्या माध्यमातून जनतेला सामान्य आणि व्यक्तिगत राहणीमानाचे नैतिक, सामाजिक, आर्थिक, भौतिक व कायदेविषयक हक्क वा अधिकार प्राप्त झाले आहेत. तरीही बदलत्या काळानुसार जनतेच्या अपेक्षीत गरजा जेव्हा सरकार पूर्ण करु शकत नाही तेव्हा जनमनातील असंतोष कृतीतून दर्शविण्यासाठी मोर्चा, उपोषण, असहकार, धरणे, निदर्शने, प्रतिबंध, रोको अशा आंदोलनांचा प्रभावी वापर जनतेकडून केला जातो. कोणताही अधिकार, हक्क मागणी करण्यामागे जनतेचा हेतू व्यक्तीगत अथवा कुटुंबाची सुरक्षा, संरक्षण, राहणीमानात सुधार घडवून आणणे हाच असतो. एक प्रकारे आपल्या आयुष्यात 'अच्छेदिन' यावेत म्हणूनच समाजातील सर्वच घटकांना संघटीत होऊन समाजमनांतील अस्वस्थता दर्शविण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे.

Tuesday, 8 January 2019

जळगाव शहराचे प्रश्न सोडवायचे कसे आणि कोणी ?

जळगाव शहरातील बहुतांश नागरी प्रश्नांचे भीजत घोंगडे पडले आहे. जळगावकरांनी सत्तेतील लोकनेत्यांचे चेहरे बदलवणारा कौल सार्वत्रिक निवडणुकांमधून दिला. त्यानंतर लोकांसाठीच्या सामुहिक सेवा - सुविधांमध्ये काही परिवर्तन घडून येईल अशी अपेक्षा केली. सरकार बदलले, सत्ता बदलली, सत्ता राबविणारे मंत्री आणि प्रशासनही बदलले पण जळगाव शहराशी संबंधित प्रश्नांची उत्तरे काही अजून सापडलेली नाहीत.