राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन सध्या द ग्रेट शो मैन ठरले आहेत. जळगाव, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हास्तरावरील आरोग्य महा शिबिरे आयोजित करुन सर्व सामान्य घटकातील रुग्णांना रोगमुक्त करण्याचा एक अभिनव उपक्रम महाजन यांनी गेले वर्षभर सुरु ठेवला आहे. महाजन यांच्या सोबतच्या मंडळींचे सहकार्य घेवून राज्याच्या पुरवठामंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी सुध्दा बीड येथे जिल्हास्तरावरील महा शिबिर घेतले. आता तालुकास्तरांवरील शिबिरांना प्रारंभ झाला आहे.
Monday, 30 October 2017
Saturday, 28 October 2017
शरद पवार नेहमीच खरे बोलतात !
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले अभ्यासू, अनुभवी, लोकप्रिय आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले आणि अलिकडे जाणता राजा म्हणून लौकिक लाभलेले शरश्चंद्र तथा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना बालिश मुख्यमंत्री अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षांत महाराष्ट्रातील निवडणुकांच्या राजकारणात फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने पवार कुटुंबियांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार धोबीपछाड दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार यांच्या ताब्यातील अनेक गढ्या या फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने काबिज केल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्या आडून टीका करताना मुख्यमंत्री पदावरील व्यक्तिस बालिश म्हटले आहे.
Wednesday, 25 October 2017
राजकिय उलथा-पालथचे हत्यार - सोशल मीडिया
Wednesday, 11 October 2017
अमृत योजनेतील मक्तेदारीचा घोळ ...
जळगाव शहरातील सुमारे पाच लाखांवर जनतेच्या पाणीपुरवठ्यासाठी वर्षभरापासून मंजूर असलेल्या
अमृत योजनेच्या कामासाठी संतोष कन्सट्रक्शन ऍण्ड इन्फ्रा यांना मंजूर झालेली
निविदा प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्दबातल ठरविली
आहे. हा आदेश देताना न्यायाधिशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ
कार्यशैलीवर कडक ताशेरे ओढले आहेत. विशिष्ट ठेकेदाराला काम देण्याचा दबाव मनपा
प्रशासनावरही झालेला आहे, असेही आता प्रथम दर्शनी दिसत आहे. खंडपिठाने अमृत
योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळा व योग्यता नसलेल्या मक्तेदारास काम देण्याचा
घाट घालणेसंबंधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जबाबदार असल्याचा दोष लावला आहे.
Monday, 2 October 2017
गांधी मुखातून गांधीवाद ...!!!
जळगाव येथील गांधीतिर्थमध्ये युवकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची भेट झाली. जवळपास दोन तास सोबत होतो. त्यांनी युवकांशी साधलेला संवादही ऐकला होता. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या सर्वसामान्य व सर्वमान्यपणाविषयी मी तुषारजींशी बोलत होतो. त्यांच्याशी झालेला हा संवाद माझ्यासाठी गांधी मुखातून गांधीवाद ऐकण्याएवढा आनंददायी होता.
Subscribe to:
Posts (Atom)