Monday, 31 October 2016

जळगाव जिल्हा भाजपतील सोयीची साठमारी ...

जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या जिल्हा नेत्यांनी सोयीचे राजकारण आरंभले आहे. राज्यस्तरावर भाजप-शिवसेना युती होणार अशी घोषणा झाल्यानंतरही भाजपच्या जिल्हा पुढाऱ्यांनी स्वबळाचा अहंकार कुरवाळत सवतेसुभे निर्माण केले आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष हे शहरातील मतदारांच्या सार्वत्रिक मतदानातून निवडून येतील. त्यामुळे सर्वच विधानसभा क्षेत्रात नगराध्यक्ष निवडणूक म्हणजे आगामी निवडणुकांची लिटमस चाचणी ठरणार आहे. मात्र या निवडणुकांनी जिल्हा भाजपत राजकीय साठमारीचा खेळ सुरु केला आहे. विरोधकांना सोडून जिल्हा नेते आपल्याच लोकांना बडवून काढत आहेत.

Sunday, 30 October 2016

युवर प्रॉब्लेम्स अर्जन्ट सोल्युशनची भोंदूगिरी !!

कोणत्याही अडचणी, प्रश्न, समस्यांमुळे माणसं परेशान असतात. घरगुती, कौटुंबिक, नातेसंबंधातील किंवा मित्र परिवारातील अथवा नोकरी, उद्योग, व्यवसाय यासह व्यापारातील काही विषय अडथळे घेवून उभे राहतात. अशा स्थितीत मानसिक, शारिरीक ताण तणाव निर्माण होतो. आर्थिक दबाव सुध्दा मानगुटावर बसतो. ही अवस्था अस्वस्थ तथा बैचेन करणारी असते. मनातले सांगायला कोणीही जवळचा नसेल तर अबोल, निश्चल न निःशब्द अवस्था अधिकच एकाकी करते. आणि मग प्रयत्न सुरु होतो समस्या, प्रश्न सोडविण्याचा नव्या तथा अघोरी मार्गांचा.

Friday, 28 October 2016

मुखवटा आणि चेहऱ्यातला संघर्ष ...

टाटा उद्योग समुहाचा चेहरा आजही टाटा परिवारातील अर्ध्वयू रतन टाटा हेच आहेत. परंपरा, विश्वास, प्रगती आणि राष्ट्रहित या मुल्यांची जोपासना करीत टाटा समुह गेल्या १४८ वर्षांत जगभरात विस्तारला. रतन टाटांच्या नंतर कोण ? हा प्रश्न निकाली काढताना सायरस मिस्री यांना टाटांचे वारस नेमले गेले. मात्र, अवघ्या ४ वर्षानंतर सायरस यांना वारसा पदावरुन पायउतार करण्यात आले. या मागील अनेक कारणे हळूहळू समोर येत आहेत. मुख्य कारण मुखवटा आणि चेहरा यांच्यातील संघर्ष हेच आहे, हेही स्पष्ट होत आहे. कार्पोरेट क्षेत्राचा खरा चेहरा हा संचालकांचे आपापसातील वर्तन, त्यांची कर्मचाऱ्यांशी वागणूक आणि लाभार्थी, ग्राहक तथा हिचिंतकांशी व्यवहार यावर ओळखला जातो. मात्र, बड्या उद्योग समुहात दिसणारे चेहरे आणि दाखवायचे मुखवटेही अनेक असतात. अशावेळी टाटांचा मूळ चेहरा आणि सायरस यांचा मुखवटा यांच्यात संघर्ष होतो. त्याचीच ही कारणमिमांसा ...  

Friday, 21 October 2016

मालक आणि सहकारी एक अनोखे नाते

जगभरात औद्योगिकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर उद्योजक व कामगारांचे, मालक व नोकराचे नाते अस्तित्वात आले आहे. बदलत्या काळाने या नात्याला भांडवलदार तथा शोषक आणि कामगार, मजूर तथा शोषणग्रस्त असेही रुप दिले.  जगभरातील नोकरदार हा आजही असंतुष्ट, अस्वस्थ असून काम करुन घेणारी यंत्रणा त्याचे शोषण करते किंवा त्याला कामाच्या श्रमाचा मोबदला कमी देते अशी तक्रार जवळपास सर्वांची आहे. भारतात सरकारी व निमसरकारी सेवेतील कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांचे संघटन आहे. त्यांना त्याच्या बळावर सहावा वेतन आयोग लागू करून सातवा वेतन आयोग स्वीकारण्याची स्थिती निर्माण करता येते. विधीमंडळ किंवा संसदीय मंडळात जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी असलेले नेतेही स्वतःचे वेतन वाढवून घेतात. 

Wednesday, 19 October 2016

हलक्या पायांची नेते मंडळी

जळगाव महानगर पालिकेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी दिल्याचा आनंदोत्सव साजरा करताना दिवाळीपूर्व मनपाची दिवाळी असे म्हणत सत्ताधारी मंडळींनी फटाके फोडले. दुसरीकडे, याच विषयावर शंकेखोरांचा शिमगा सुरू आहे. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याची आचार संहिता आहे. मग, हा निधी मिळेल का ? रस्त्यांचे प्रस्ताव इतर योजनेत मंजूर आहेत. मग, मागील प्रस्तावांचे काय ? २५ कोटी खर्चाचा प्रस्ताव नव्याने द्यावा लागेल ? अशा या शंका आहेत. या संदर्भात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हाच की, जळगाव हे महानगरपालिका क्षेत्र आहे. इतर नगरपालिकांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचा येथे कोणत्याही कामकाजावर परिणाम शक्य नाही. यापूर्वी इतर निवडणुकांच्या कामकाजाविषयी न्यायालयाने तसे निकाल दिले आहेत. त्यामुळे शंकेखोर मंडळींनी फारशी चिंता न करता मनपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे काम करु द्यावे. 

Monday, 17 October 2016

भाजपतील “दबक्या पाऊलांची” माणसं !!

जळगाव जिल्ह्यात इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत पक्षीय बल व पदांच्या संख्येत भाजप कागदावर बळकट आहे. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणता येईल अशी स्थिती अजुनही आहे. दोन खासदार, विधानसभेचे ५ आमदार, विधान परिषदेचे २ आमदार असून जिल्हा परिषद, अनेक पंचायत समित्या, नगर पालिका यासह जिल्हा सहकारी बँक, दूध संघ, बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यात फोफावलेला भाजप लक्षात घेवून राज्याच्या मंत्रीमंडळात जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांना मंत्रीपदे मिळाली होती. यात खडसेंकडे १२ मंत्रालयांचा तर महाजनांकडे १ मंत्रालयाचा भार होता. महसूल, कृषि, राज्य उत्पादन शुल्क व जलसंपदा अशा वजनदार व मालदार खात्यांचा भार खडसे व महाजनांकडे होता. म्हणजेच जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला जे भरभरुन दिले त्या बदल्यात पक्षानेही या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्री रुपाने भरभरुन दिले होते.

Friday, 14 October 2016

सच्चा आणि अच्छा मित्र कैलासअप्पा !

काही माणसांची मैत्री का होते ? या प्रश्नाचे नेमके उत्तर कधीकधी देता येत नाही. मैत्रीतले नाते पाण्यासारखे नितळ आणि पारदर्शी असले की, मैत्री सुध्दा एकमेकात गुंतल्यासारखी होते. कैलासअप्पा सोनवणे यांच्याशी माझी मैत्री अशीच आहे. एकमेकात गुंतलेली. एकमेकांविषयी जिव्हाळा व आदर असलेली. म्हणून कैलासअप्पाचा उल्लेख एकेरी केला आहे.

Tuesday, 11 October 2016

सीएम फडणवीस आणि भाजपचा सोशल मीडिया सेल आहे कुठे ?

रायगडावर शिवराज्याभिषेकदिनी वंदन करणारे पहिले मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रातील समाज मन सध्या सामाजिक विषयांवर अस्वस्थ आहे. आपापल्या समस्या मांडण्यासाठी विविध समाज, जाती एकत्र येवून संख्यात्मक ताकद दाखवित आहेत. मराठा समाजाचे मूकमोर्चे, बहुजन लेबल घेवून निघालेला माळी समाजाचा मोर्चा ही या शक्तीप्रदर्शनाची ताजी उदाहरणे. आपली शक्ती संख्यात्मक रुपात दाखवली जावी असे दलितांमध्येही घाटते आहे. विषय समोर नसल्यामुळे तूर्त त्यांची माघार आहे. मुस्लिमांच्या मनांतही असंतोष आहे. संख्यात्मक शक्ती दाखविण्याची सोय ते सुध्दा पाहत आहेत. मूकमोर्चांचे फलित संबंधित समाजाच्या पदरात काय पडते ? याचा विचार करुन ब्रम्हवृंद समाजही कडेकडेने निरीक्षण करतो आहे. असे हे वातावरण "तू एक अस्वस्थ ... मी एक अस्वस्थ" असे आहे.

Saturday, 8 October 2016

सर, आपण पत्रकार आहात का ???

गेली २६ वर्षे वृत्तपत्र माध्यमात विविध पदांवर काम करीत होतो. सात महिन्यांपासून वृत्तपत्राच्या संपादकिय कामकाजातून बाजुला झालो आहे. सोशल मीडियाशी संबंधित विविध पर्यायी माध्यमांचा वापर करीत पत्रकार म्हणून लिखाण सुरु ठेवले आहे. सकाळ, देशदूत व तरुण भारत या वृत्तपत्रांमध्ये फोटोग्राफर, बातमीदार, उपसंपादक, सहयोगी, सहाय्यक तथा मुख्यसंपादक म्हणून काम केले. या वृत्तपत्रांमधून सातत्याने लिखाण करीत आलो. सकाळमधील दखल हे सदर देशदूत व तरुण भारतमध्येही नियमितपणे लिहीले. सकाळमधील लेखांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा पुरस्कारही मिळाला. खान्देशातील अनेक संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात संपादक म्हणूनही गेलो. वृत्तपत्राचा संपादक असलेली ओळख तेव्हा विशिष्ट परिघातच होती. वृत्तपत्रातून लेख लिहीताना संस्थात्मक धोरणाच्या आणि काही व्यावसायिक हितसंबधांच्या मर्यादा पाळाव्या लागत. कितीही तटस्थपणे आणि सत्य लिहायचे म्हटले तरी लेखणीचे स्वातंत्र्य आकसून जात असे.

Tuesday, 4 October 2016

कारभारी देवेंद्र यांच्या मापात पाप ... !!!

नाशिक येथे ओबीसी समाजाने मोर्चा काढून माजी उपमुख्यमंत्री तथा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची कारागृहातून सुटका कराण्याच्या मागणीचा राज्य सरकारवर दबाव निर्माण केला आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोळ केल्याचा भुजबळ यांच्यावर आरोप आहे. भुजबळांवर हा आरोप केंद्र सरकारची यंत्रणा ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने केला असून त्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल आहे. भुजबळांवरील सर्व आरोपांची माहिती व त्यातील गांभीर्य लक्षात घेवून उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही भुजबळांना गेल्या दीड वर्षात जामीन दिलेला नाही. अशा पध्दतीने कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात संशयित आरोपी असलेल्या भुजबळांची कारागृहातून सुटका करण्यासाठी ओबीसींच्या नावाने मोर्चा काढून झुंडशाहीचा काळा अध्याय लोकशाहीच्या नावावर लिहीला गेला आहे.

Monday, 3 October 2016

“ब्लॅक आऊट अच्छा है ...!!!”

ब्लॅक आऊट वर्धापनदिनाचा केक कापताना मान्यवर
ब्लॅक आऊट म्हणजे, वीजेचा पुर्णतः वापर बंद करुन अंधार करणे. युद्धाची स्थिती असलेल्या भागात शत्रू सैन्याचा रात्री होणारा हल्ला गृहीत धरुन नागरिकांना ब्लॅक आऊटसाठी आवाहन केले जाते. किंबहुना तशी सक्तीच असते. मात्र, ब्लॅक आऊटचा वापर एखाद्या कॉलनीतील रहिवासी वीज बचत करण्याच्या हेतूने सुरू करतात आणि त्यातून कॉलनी परिसरातील नागरिकांचा आपापसात, कुटुंबात संवाद वाढून विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक व सामुहिक उपक्रम सुरू होतात. जीवनशैली बदलून टाकणारा हा अनुभव समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. 

Saturday, 1 October 2016

माँ शक्ति के उपासना का मूलार्थ

चरणसे यश प्राप्ती और वाचासे सर्वनाश
आजसे (दि. १ अक्तुबर २०१६) नवरात्री का हुआ है. हिंदू काल गणनानुसार वर्ष के १२ मास में चैत्र और अश्विन मास में माँ शक्ति की उपासना का पर्व हिंदू जनजाती में मनाया जाता है. हिंदू देविदेवताओंकी रचना हमारे समाज जिवनसे प्रभावित है. हिंदू जनजाती कुटुंबवत्सल है. पती, पत्नी और पुत्रादी से परिवार पूर्ण स्वरुप होता है. सामाजिक व्यवस्थाकी यह रचना हमारे देवादिकोके प्रतिको में हम अनुभवित करते है. देवादिक के पूजन का अर्थ अंधश्रध्दा नही, परंतु मानव जाती के भीतर कार्य और वर्तन से दर्शाए शौर्य, ममत्व, विश्वास और आस्था की प्रचिती है. माँ शक्ति का पूजन यह मानव जातीके शौर्य और गुणोंका पूजन है.