आपण शांति धरावी व
दुसऱ्यास धरायाला लावावी
आपण तऱ्हेवाईकपणा सोडावा,
व दुसऱ्याकडून सोडवावा
आपण चांगली क्रिया करावी व
पुष्कळांकडून करवावी
एखाद्याला अपाय करावयाचा
असेल तर तो बोलून दाखवू नये, परभारेच त्याला त्याचा ठोकताळा आणून द्यावा
राजकारण पुष्कळ केले तरी
ते कोणाला कळू देवू नये, पण ते करताना दुसऱ्याला पीडा देण्याचा हेतू नसावा.
 |
तापी पूर्णी शुगर प्रॉडक्टची नेटवर माहिती १ |
“सार्थ दोसबोध” चे पारायण करताना “दशक अकरावे” हे “भीमदशक”
असून त्यात पाचवे प्रकरण “राजकारण” या विषयावर आहे. राजकारण करणाऱ्या माणसात कोणते
गुण असावेत आणि राजकारण कसे करावे ? याविषयी
समर्थांनी २७ लक्षणे सांगीतली आहेत. त्यातील काही ओळींचा साधा सोपा अर्थ वर दिला आहे.
राजकारण करताना एखाद्याचा काट्याने काटा काढायचा असेल तर ते मुखावर न आणता परभारेच
त्याचा काटा काढावा असे समर्थांनी इतर लक्षणांच्या सोबत सांगीतले आहे. आज हे
आठवण्याचे कारण म्हणजे, सध्या सुरू असलेल्या “अर्धसत्याचा खेळखंडोबा” होय.