बालिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून खानावळींचे वर्चस्व आहे. अभिनयाच्या गुणवत्तेवर आणि ‘अंडरवर्ल्ड’ शी असलेल्या आर्थिक संबंधातून खानांची किती आणि कुठे चलती आहे, हा चौकशीचा तसाच शोधाचा मुद्दा आहे. चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत कोणत्या खानाचे कोणाशी कसे लागेबांधे असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खानावळ मंडळी पाकिस्तानच्या कलावंतानाही बॉलिवूडमध्ये सहज घुसवून टाकतात. खानावळीच्या गोतावळ्यात ‘परफेक्टनिस्ट’ म्हणून लौकिक मिळवणारा आमिर खान सध्या तमाशातील सोंगाड्यासारखे काम करीत आहे. फरक एवढाच की, तमाशातला सोंगाड्या प्रामाणिकपणे रसिकांना हसवायचे काम करतो तर, आमिरने वठविलेला सोंगाड्या जगभरात भारताच्या साहिष्णू प्रतिमेला धक्का पोहचवून देशवासियांना ‘लाजवायचे’ काम करीत आहे.
Saturday, 28 November 2015
Tuesday, 24 November 2015
आपला तो बाळासाहेब, दुसऱ्याचा तो कार्टा...
आपला तो बाळासाहेब, दुसर्याचा तो कार्टा
![]() |
बीमा भारती |
यावर मत मांडताना पहिला मुद्दा पाहू. महाराष्ट्राच्या प्रभावशाली मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील यांचे नाव घेतले जाते. मात्र, वसंतदादा अल्पशिक्षित होते. त्यांनी आपले सामाजिक भान आणि अनुभव याच्या जोरावर मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. याशिवाय, इतरही अनेक लोकप्रतिनिधींचे शिक्षण कमी असतानाही त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची नोंद इतिहासात झालेली आहे. त्यात सविस्तर जाण्याचे कारण नाही.
Subscribe to:
Posts (Atom)