Monday, 27 April 2015
'मधुकर’चा कलाटणी देणारा कौल
Saturday, 25 April 2015
वृत्तलेखन कार्यशाळेला लाभले "चार चाँद"
हम निकले साथमें और कारवाँ बनता-बढता गया
जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि जळगाव तरुण भारततर्फे दि.२३/ २४/ २५ एप्रिल २०१५ अशी ३ दिवस पत्रकार, लेखक, जाहिरातदार आदींसाठी मोफत कार्यशाळा झाली. यात मुख्य मार्गदर्शक म्हणून तरुण भारतचे मुख्य संपादक दिलीप तिवारी यांनी भाषा, शुध्द लेखन, वृत्तलेखन व पद्धती आणि लेखन कार्याशी संबंधित साधने यावर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी ४५, दुसऱ्या दिवशी ३९ आणि समारोपाच्या दिवशी ४६ जणांनी सहभाग घेतला.
![]() |
दिलीप तिवारी |
‘पेपर रद्दी’च्या बदल्यात ‘नव्या वह्या’
आनंद पब्लिकेशन्सचा उपक्रम ः देशभरात युवकांची साखळी जोडणार
पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशातून जळगावच्या आनंद पब्लिकेशन्सच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘रद्दी द्या’ नव्या कोर्या ‘नेचर फ्रेंडली वह्या घ्या’, हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या हा उपक्रम पुण्यात सुरू असून तेथे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही माहिती आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांनी दिली.
पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशातून जळगावच्या आनंद पब्लिकेशन्सच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘रद्दी द्या’ नव्या कोर्या ‘नेचर फ्रेंडली वह्या घ्या’, हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या हा उपक्रम पुण्यात सुरू असून तेथे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही माहिती आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांनी दिली.
Sunday, 19 April 2015
पालकांशी समन्वयासाठी ‘अॅप’
नंदुरबारचे किशोरभाई वाणी यांचा प्रयत्न ः नंदुरबारच्या ‘केआरपीएस’चा उपक्रम
शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगती, गुणवत्ता आणि वर्तणुकीची माहिती पालकांना देण्यासाठी ‘ऍण्ड्राईड ऍप’ चा वापर करण्याची अभिनव संकल्पना नंदुरबारच्या कन्हय्यालाल रावजी पब्लिक स्कूलने (केआरपीएस) अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. बदलत्या काळानुसार नव्या तंत्राचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना संभाव्य स्पर्धेत कसे उतरवता येईल, याचाच ध्यास घेतलेले नंदुरबारचे उद्योगपती तथा सर्वांत मोठे आडत व्यापारी किशोरभाई वाणी यांच्या नेतृत्वात ही शाळा वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग राबवित आहे.
गारपिटचे संकट अटळच !

Wednesday, 15 April 2015
माझे चौथे आयुष्य...( अर्थात इंटरनेटवरचे सातबारा)
Monday, 13 April 2015
‘जिल्हा बँकमां काय भेटस रे भौ?’
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी १८ जागांसाठी सुमारे २६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. जवळपास १०० वर उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यातील काही संभाव्य उमेदवार सहकार विभाग किंवा न्यायालयाकडे जावून अर्ज वैध ठरवावेत म्हणून प्रयत्न करण्याची शक्यता आहे. प्रसंगी निवडणूक प्रक्रिया पुढेही ढकलली जाईल असे दिसते (तशी शक्यता नाहीच). ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्व पक्षीय नेेते गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उडालेली झुंबड पाहाता सर्व सामान्य माणूस पुढार्यांना प्रश्न विचारतोय की, ‘जिल्हा बँकमां काय भेटसरे भौ?’
Sunday, 5 April 2015
पीकेचा पडद्यामागील पंचनामा!
![]() |
Amir in Makkah |
विकास नियोजनातील वास्तव
शासनाच्या निधीतून विकासाच्या मोठ्या योजना राबविण्याचे दिवस संपले आहेत. कर स्वरुपातून होणारी महसुली जमा आणि नागरीकांच्या किमान गरजा कार्यक्रमावरील खर्चाचा ताळमेळ घालू न शकणारी शासन व्यवस्था नागरी सुविधा आणि सेवांशी सबंधित विकास कामे खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याला प्राधान्य देत आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेतून उभारल्या जाणार्या प्रत्येक विकाससेवेसाठी नागरीकांना यूज ऍण्ड पे पद्धतीने खर्च करावा लागत आहे. विकासाचे हे मॉडेल अडचणीचे आणि असंख्य तक्रारींचे ठरत आहे. विकास नियोजनातील हेच वास्तव लक्षात घेवून पुन्हा एकदा लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून विकासाचे नवे सामाजिक मॉडेल निर्माण करावे लागणार आहे.
निसटामार्गाचे सेवेकरी
राजपटावर सत्तेच्या जवळ जाण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी दोन प्रकारच्या मार्गांचा अवलंब केला जातो. पहिला म्हणजे, एकाच विचारधारेशी कायम प्रामाणिक राहून सत्ता प्राप्तीची प्रतीक्षा करणे. हा मार्ग खूप वेळ घेणाराही असू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे, सत्तेत असलेल्या कोणत्याही विचारधारेशी तडजोड करणे. शक्य होईल तेव्हा आपली विचारधारा बदलणे. हा मार्ग संधीनुसार बदलता येतो. वरील दोन्ही क्रियांसाठी दोन चांगले पर्यायी शब्द समोर आहेत. पहिल्या विचारधारेसोबत कायम राहणार्यांना आपण ‘निष्ठामार्गावरुन’ जाणारे वारकरी म्हणू शकतो. मात्र, बदलत्या विचारधारेशी गरजेनुसार संधी साधणार्यांना आपण ‘निसटामार्गाचे सेवेकरी’ म्हणू शकतो. याचे कारण, ही मंडळी एकाजागेहून दुसर्या जागेसाठी कधीही निसटू शकतात. त्याचे उद्दिष्ट हे सेवा देण्याचे किंवा घेण्याचे असते, म्हणून ते सेवेकरी....
७/१२ अॅट व्हाट्स अॅप टू फेसबुक
सध्या समुह चाळ्यांचे व्यक्तिगत माध्यम असलेल्या व्हाट्स ऍपवर कोण कशाची चर्चा करेल सांगता येत नाही? परवा आमच्या कान्हदेश गृपवर ‘सातबारा’ या विषयावर अशीच चर्चा रंगली. एकाने सातबारा नाव कसे तयार झाले? याची पोस्ट शेअर केली. त्यानंतर सदस्यांची चर्चा रंगली ती शेतीच्या आठवणींवर. गृपमधील काही सदस्यांचा शेतीशी संबंध आहे. कोणी कधीतरी शेतीत काम केले आहे. त्या आठवून रात्री उशिरापर्यंत विषय चर्चेत होता. शेती परवडत नाही पासून कोरवाडू शेतकर्यांचे आजचे प्रश्नही मांडले गेले. एका सदस्याने हा विषय व्यापक समूह चाळ्यांच्या फेसबुकवर नेला आणि विषय गंभीरही झाला...
Saturday, 4 April 2015
निवडणुकीपुरता सुरेशदादा आपला माणूस!
जैन समर्थकांची अवस्था सध्यातरी कोणता झेंडा घेवू हाती
जळगाव मनपाच्या घरकुल प्रकरणात जळगावचे आमदार व नेते सुरेशदादा जैन हे गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असल्याची आठवण काल पासून तीव्रतेने होत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणूकपूर्व मेळावा घेण्यासाठी काल जळगावात आले होते. त्यांनी कार्याकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितले की, सुरेशदादा आपला माणूस आहे, त्याला राज्यातल्या कॉंग्रेस आघाडी सरकारने तुरूंगात डांबले आहे...त्यानंतर ठाकरे हे जैन कुटुंबियांच्या भेटीसाठी त्यांच्या घरीही गेले...तेथे त्यांची खातरदारी झाल्याचेही फोटो आणि वर्णन छापून आले आहे...
कारभारी दमानं !
जामनेर तालुक्यातील जनतेचे आमदार गिरीश महाजन सध्या राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. महाजन यांना ‘भाऊ’ सुद्धा म्हणतात. जामनेरकरांमध्ये ‘टपरीवरचा आमदार’ किंवा ‘बुलेटवाला आमदार’ अशीही महाजन यांची ओळख आहे. ती वर्षानुवर्षे आहे आणि राहील सुद्धा. महाजन यांना मंत्रिपदाची शपथ देवविताना राज्यपालांनी महाजन यांच्या मुखातून ‘माझे शुद्ध आणि सद्विवेकी आचरण’ राहिल असे जाहीरपणे वदवून घेतले आहे. याशिवाय, ‘कायद्याद्वारे स्थापित राज्याचा मी घटक असेन, त्याचे पालन करीन,’ असेही महाजन यांनी शपथेवर म्हटले आहे. त्यामुळे मंत्री म्हणून आपले सार्वत्रिक ‘वर्तन’ आणि व्यक्तिगत ‘वागणूक’ याच्याशी संबंधित आचरणाविषयी ‘मंत्री महाजन’ यांना गंभीर व्हावेच लागणार आहे. राज्याच्या या कारभार्याला ‘कारभारी दमानं’ असे सांगण्याची ही वेळ आहे...
खेळ नियतीचा !
(माझ्या गुन्हेगारीला गोल्डमेडलच्या टाळ्या)
मित्राहो, मी अंध विश्वासू नाही पण, आयुष्यातील काही घटना अशा घडतात की, कुठेतरी-कोणीतरी-काहीतरी नियंत्रित करते आहे, असे वाटायला लागते. आज (दि. १६ मार्च २०१५) ला मला याची पुन्हा प्रचिती आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २३ व्या पदवीदान समारंभात ‘एमए मासकॉम’ या अभ्यासक्रमात विद्यापीठात पहिला आल्याबद्दलचे ‘गोल्डमेडल’ मी स्वीकारले. हे ‘गोल्डमेडल’ मला डून विद्यापीठाचे (देहराडून, झारखंड) कुलगुरू प्रा. व्ही. के जैन यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर एकाबाजूला उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम आणि कुलसचिव प्रा. डॉ. अशोक महाजन टाळ्या वाजवत होते.
मित्राहो, मी अंध विश्वासू नाही पण, आयुष्यातील काही घटना अशा घडतात की, कुठेतरी-कोणीतरी-काहीतरी नियंत्रित करते आहे, असे वाटायला लागते. आज (दि. १६ मार्च २०१५) ला मला याची पुन्हा प्रचिती आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २३ व्या पदवीदान समारंभात ‘एमए मासकॉम’ या अभ्यासक्रमात विद्यापीठात पहिला आल्याबद्दलचे ‘गोल्डमेडल’ मी स्वीकारले. हे ‘गोल्डमेडल’ मला डून विद्यापीठाचे (देहराडून, झारखंड) कुलगुरू प्रा. व्ही. के जैन यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर एकाबाजूला उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम आणि कुलसचिव प्रा. डॉ. अशोक महाजन टाळ्या वाजवत होते.
Friday, 3 April 2015
मंगळागौरीचे व्रत
श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात
अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न
झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते.
पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या
कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे.
रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल
करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.
त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा
त्र्यंबकेश्वरला श्रावणातील तिसर्या सोमवारच्या ब्रह्मतगरी प्रदक्षिणेला
पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी एकलाखावर भाविक या खडतर
प्रदक्षिणेत सहभागी होतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वर
येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी बाविक गर्दी करतात. पुण्यदायी,
मोक्षाकडे सन्मार्गाकडे नेणारी प्रदक्षिणा म्हणून बाविकांचा समज आहे.
‘भोलेहरऽऽऽ’च्या जयघोषाने त्र्यंबक परिसर दुमदुमला जातो. दरवर्षी सुमारे
लाखावर भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही प्रदक्षिणा करण्याची परंपरा
अतिप्राचीन आहे.
गोदावरी प्रदूषणाचे गुन्हेगार कोण?
दर एक तपानंतर गोदावरी काठावर होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे देव
तथा संतभूमी त्र्यंबकेश्वर आणि मंदिरांची पवित्र भूमी नाशिक हे जगप्रसिद्ध
झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे गोदावरीचे
अस्तित्त्व आकुंचित होत असून, विविध कारणांमुळे प्रदूषित होणारे पाणी हे
वापराच्या लायकसुद्धा नाही. माशांचा मृत्यू आणि पात्रात फोफावणार्या
पाणवेलींच्या समस्येमुळे गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेच्या ऐरणीवर आहे.
गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा देखावा त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक
महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असतात. थातूर- मातूर कारवाई आणि
चिल्लर स्वरुपातील स्वच्छता मोहीम अशा पत्रकबाजीत गोदावरी प्रदूषणाचे खरे
गुन्हेगार मात्र बाजूला पडत आहेत....
जळगावच्या गुन्हेपटावर दुसर्या पिढीचा रक्तसंघर्ष
गेल्या 20- 25 वर्षांत जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्यांची सशस्त्र दहशत
पोलीसांच्या कणखर कारवाईमुळे संपुष्टात आली आहे. टोळ्यांच्या
म्होरक्यांनीही स्थानिक स्वराज्य, सहकारी, शिक्षण आणि काही क्रीडा
संघटनांमध्ये कारभारीपदे मिळविल्यामुळे त्यांचे लोकदर्शन सभ्यतेचा मुखवटा
घालून होत आहे. असे पांढरपोषाखी पुढारी पोलीसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला
घाबरतांना दिसतात. हा धाक निश्चितच कायद्याचाच आहे. मात्र, एप्रिल 2012
मध्ये एकमेकांवर सशस्त्र हल्ल्याच्या घडलेल्या काही घटना पाहता
गुन्हेगारीपटावर दुसर्या पिढीचा रक्तसंघर्ष सुरू झाला की काय? अशी शंका
येते. नव्या गुंडाराजचा हा बाका प्रसंग ओळखून पोलीसांनीही दंडाराज
अस्तित्वात आहे, हे दाखवून द्यायलाच हवे...
परिवर्तनाच्या उंबरठ्यावर लेवा पंचायत
लेवा पाटील समाजाच्या जात पंचायतीला पाऊणशे वर्षांचा इतिहास आहे. समाजातील
वाद आणि कौटुंबिक कलह मिटविण्याचे न्यायालयबाह्य व्यासपीठ म्हणून बहुतांश
कुटुंबांनी पंचायतीत झालेले निर्णय मान्य केले आहेत. दोषारोपाचे एक बोट
दाखवून ही व्यवस्था बदनाम होईल मात्र उध्वस्त होणार नाही. पंचायतीला
सांभाळणारे अनेक हात असून त्यांच्या सहकार्याने नव्या जोमाने, चेहर्यानेे
पंचायत कार्यरत राहील. तसे करताना आरोपांच्या मागील काही कारणांचे वास्तवही
समाजातील मान्यवर, प्रज्ञावंतांनी जाणून घ्यावे. तरच परिवर्तनाचा उंबरठा
ओलांडल्याचे चित्र साकारले जाईल...
दरवाजाबाहेरचे मुस्लिम मराठी साहित्य
जळगाव येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे
उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले. डाविकडून आयोजक फारुक शेख, डॉ. एस. एन.
लाळीकर, स्वागताध्यक्ष गफार मलिक, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन,
कॉ. विलास सोनवणे, मुस्लिम मराठी सहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.
इक्बाल शेख मिन्ने, संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आजम आणि इतर.
आनंदयात्री ! - अशोकभाऊ जैन
अजातशत्रू असलेल्या श्री. अशोकभाऊ जैन हे आज वयाची 50 वर्षे पूर्ण करीत
आहेत. त्यांच्याकडे येणारा कंपनीतला व बाहेरचा माणूस अडचणी घेऊन येतो.
त्यावर शक्यतो मार्ग काढून अडचणी सोडविण्याचे काम श्री. अशोकभाऊ करतात,
म्हणून ते ठरतात ‘आनंदयात्री’
शरददादांची भावकी !
नेत्यांनाही अडचणीत आले. त्यापैकी "दखल' घ्यावी लागेल ती मंत्री डॉ.
विजय गावित यांचे बंधु शरद गावित यांनी "बहुजन समाजवादी पक्षा'तर्फे
केलेल्या उमेदवारीची. श्री. शरद गावित एवढे फोकसमध्ये नव्हतेच. मात्र,
मंत्र्यांचे भाऊ आणि कॉंग्रेस विरोधातील उमेदवारी यामुळे ते चर्चेत आले
आहेत...
इंटरनेट वापरणार्यांचे "123456'' वर प्रेम
'इंटरनेट'च्या मायाजालमध्ये प्रवेश व त्याच्या वापरासाठी पासवर्ड
(सांकेतांक) हा महत्त्वाचा घटक. त्याच्याशिवाय संगणकीय किंवा नेट यंत्रणा
हाताळता येत नाही. जेवढी माणसं त्यापेक्षा जास्त त्यांचे पासवर्ड. इंटरनेट
वापरणारे कोट्यवधी ग्राहक आणि त्यांचे कोट्यवधी सांकेतांक. मात्र, यापैकी
लाखो लोकांचे सांकेतांक हे सारखेच तयार होत असल्याचे लक्षात येत आहे. सोपा
आणि लक्षात राहणारा "पासवर्ड' हवा या हेतूने तयार केले जाणारे अंक- अक्षर
समुह नेहमीच्या वापरातील असल्याचे जगभर केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत
आहे. जगभरात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक ग्राहक "123456' या अंक समुहाचा
पासवर्ड म्हणून वापर करतात असे लक्षात आले आहे. त्याची ही दखल...
होम चिकित्सा केंद्र - तपोवन
पारोळा- अमळनेर रस्त्यावर पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन हे होम चिकित्सा केंद्र आहे. तेथे जैविक ऊर्जा, वैद्यकशास्त्र, कृषिशास्त्र आणि हवामानशास्त्र याचा वैदीक पद्धतीने अभ्यास व प्रचार- प्रसार केला जातो. अग्निहोत्राच्या माध्यमातून या शास्त्रांचा सुरेख संगम घालून निसर्गदायी झालेली मानवी जीवनशैली येथे अनुभवता येते. त्याच्या अनोखा प्रवास...
Wednesday, 1 April 2015
फळे, भाज्यांना कृत्रिम आकार
निसर्गासोबत राहणे आणि त्याचा आनंद घेणे हा मानवाचा मुलभूत हक्क आहे. मात्र, निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवून मानवी गरजा-सुविधांचा विकास करण्याच्या धोरणांना संपूर्ण जगभरातून विरोध आहे. परंतू काहीवेळा मानवी कल्पकतेतून निसर्गातील वृक्ष, वेली, पाने, फुले, फळे, वनस्पती यांच्या रचनेतही बदल केले जातात. हे बदल कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक व सहाय्यक ठरतात. सध्या काही कृत्रिम बदल फळे, भाज्यांच्या आकारात केले जात आहेत. या बदलांच्या मनोरंजक आढावा...
Subscribe to:
Posts (Atom)